लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे एका सभेत बोलताना विरोधकांना खोचक टोला मारला आहे. यावेळी ते म्हणाले, "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत." त्यामुळे विरोधकांना सरळ शब्दात उत्तर मिळाले आहे.



बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याकरता अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. दरम्यान आज दरबंगा येथे प्रचारार्थ गेलेल्या अमित शाहांनी सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत एका दगडात चार पक्षी मारले आहेत.




तसेच लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा या प्रकरणात सहभागी आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसवर १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत, असे म्हणत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघात केला आहे.

Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी