लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे एका सभेत बोलताना विरोधकांना खोचक टोला मारला आहे. यावेळी ते म्हणाले, "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत." त्यामुळे विरोधकांना सरळ शब्दात उत्तर मिळाले आहे.



बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याकरता अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. दरम्यान आज दरबंगा येथे प्रचारार्थ गेलेल्या अमित शाहांनी सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत एका दगडात चार पक्षी मारले आहेत.




तसेच लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा या प्रकरणात सहभागी आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसवर १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत, असे म्हणत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघात केला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला