लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथे एका सभेत बोलताना विरोधकांना खोचक टोला मारला आहे. यावेळी ते म्हणाले, "बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत." त्यामुळे विरोधकांना सरळ शब्दात उत्तर मिळाले आहे.



बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या बिहारमध्ये निवडणूकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. याकरता अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. दरम्यान आज दरबंगा येथे प्रचारार्थ गेलेल्या अमित शाहांनी सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका करत एका दगडात चार पक्षी मारले आहेत.




तसेच लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा या प्रकरणात सहभागी आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसवर १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत, असे म्हणत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघात केला आहे.

Comments
Add Comment

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर