रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश!


नागपूर : नागपूर येथील परसोडी गावाजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे.


आंदोलनाची परवानगी २८ ऑक्टोबरसाठी होती मात्र, २९ तारखेला देखील आंदोलन सुरू असल्यामुळे परिसरातील वाहनांना व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक रुग्णालये असून, रुग्णांना देखील हालचाल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणले.


नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी हा आदेश अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्त, परिसराचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग पोलिस यांनी आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले आहे. पोलीसांच्या स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांनीही बच्चू कडू यांना भेटून आदेशाबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

लालूंच्या मुलाला CM आणि सोनियांच्या मुलाला PM बनायचंय, पण त्या दोन्ही जागा रिक्त नाहीत, केंद्रीय मंत्री अमित शहांचा विरोधकांना टोला!

बिहार: बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ज्यात सत्ताधारी आणि

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

आदित्य ठाकरेंनी 'महाराष्ट्राचा पप्पू' बनू नये!

मतदार याद्यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; राहुल गांधींसारखे 'खोदा पहाड, चुहा भी नही निकला' मुंबई: शिवसेना

माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले