रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश!


नागपूर : नागपूर येथील परसोडी गावाजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे.


आंदोलनाची परवानगी २८ ऑक्टोबरसाठी होती मात्र, २९ तारखेला देखील आंदोलन सुरू असल्यामुळे परिसरातील वाहनांना व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक रुग्णालये असून, रुग्णांना देखील हालचाल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणले.


नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी हा आदेश अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्त, परिसराचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग पोलिस यांनी आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले आहे. पोलीसांच्या स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांनीही बच्चू कडू यांना भेटून आदेशाबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

'जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्यांची; आंबेगावच्या सर्वांगीण विकासाला गती देऊ '

पर्यटन, उद्योग, पाणी यासाठी मांडला मोठा आराखडा जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ

विलिनीकरणाची घाई केलेल्यांनी आधी कोणत्या पक्षात जाणार किंवा कुणामध्ये विलिनीकरण करणार या संदर्भात भूमिका स्पष्ट करावी -आनंद परांजपे

ठाणे : दादांच्या अपघाती मृत्यूनंतर अजूनही आम्ही दुःखातून सावरलेलो नाही, त्यांचे अग्निसंस्कार होण्याच्या आधीच

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मंगळवारी स्वीकारणार पदभार

- मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार मुंबई: दिवंगत

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी महायुती सरकारकडून विशेष खबरदारी

महिलांसाठीच्या ‘वन स्टॉप सेंटर्स’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करणार मुंबई : महिलांवरील हिंसाचार,

Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात हालचालींना वेग; लवकरच अध्यक्षपदाचा तिढा सुटणार

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.