रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंना कोर्टाचा दणका!

शेतकरी कर्जमाफी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाची सुमोटो दाखल, बच्चू कडूंना आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश!


नागपूर : नागपूर येथील परसोडी गावाजवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुमोटो दखल घेतली आहे.


आंदोलनाची परवानगी २८ ऑक्टोबरसाठी होती मात्र, २९ तारखेला देखील आंदोलन सुरू असल्यामुळे परिसरातील वाहनांना व प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. या भागात अनेक रुग्णालये असून, रुग्णांना देखील हालचाल करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खंडपीठाने निदर्शनास आणले.


नागपूर खंडपीठाने बच्चू कडू यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या व्यक्तींना आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलन स्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, पोलीस अधिकाऱ्यांनी हा आदेश अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी आणि उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत याचा अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.


कोर्टाच्या आदेशानुसार नागपूर पोलीस आयुक्त, परिसराचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग पोलिस यांनी आदेशाची पूर्तता करण्यास सांगितले आहे. पोलीसांच्या स्पेशल ब्रॅंचचे डीसीपी सातव यांनीही बच्चू कडू यांना भेटून आदेशाबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींना मोठा झटका; मतदार यादीतून थेट ९०.६६ लाख नावे वगळली

- निवडणूक आयोगाकडून जिलानिहाय आकडेवारी जाहीर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत (एसआयआर)

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या