लोकसेवकाचा भ्रष्टाचार! तक्रारीची चौकशी करण्यासाठी मागितली लाच... अन् अडकला जाळ्यात

नागपूर: मासेमारीचा करारनामा संस्थेने रद्द का केला? या प्रकरणी चौकशी करण्यात यावी म्हणून अर्ज केलेल्या तक्रारदाराकडून लाच मागणाऱ्या सहायक निबंधकाला रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले आहे. नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यासाठी सापळा रचत लाचखोर सहायक निबंधकाला पकडले आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे असे लाचेची मागणी करणाऱ्या सहायक निबंधकाचे नाव असून ते सहकारी संस्था गोंदिया तथा अतिरीक्त प्रभार सहकारी संस्था (दुग्ध व मत्स्य) भंडारा येथे सहायक निबंधक या पदावर कार्यरत होते.


तक्रारदार यांचा मासेमारी व्यवसाय आहे. यासाठी त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ईटीयाडोह जलाशय मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेसोबत मासे खरेदी आणि विक्रीचा करारनामा केला. या करारनाम्याचा कालावधी २०२३ ते २०२७ दरम्यानचा आहे. मात्र काही कारणास्तव संस्थेने त्यांचा करारनामा मुदतपुर्व रद्द केला. याबाबत तक्रारदार यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था दुग्ध व मत्स्य भंडारा यांच्याकडे चौकशीसाठी तक्रार केली. यावेळी सहायक निबंधक सुदाम लक्ष्मण रोकडे यांनी चौकशीसाठी तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी केली.




सहायक निबंधकाने लाच मागितल्यामुळे तक्रारदाराने नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपुरच्या पथकाने ९ ऑक्टोबर, १६ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या सापळा पडताळणी दरम्यान सुदाम रोकडे यांनी लाचेच्या रकमेचा पहिला हफ्ता स्वीकारण्याची तयार दाखवली. मात्र २८ ऑक्टोबर रोजी सहायक निबंधकाला सापळा रचल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्विकारली नाही.


याप्रकरणी सदर लोकसेवक यांनी आपले पदाचा दुरुपयोग करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता लाच रक्कमेची मागणी केल्याने त्यांच्या विरुध्द गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनीयम १९८८ (संशोधन-२०१८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये पोलीस उपअधिक्षक अनिल जिट्टावार, पोलिस निरीक्षक जितेंद्र वैरागडे,राजकिरण येवले आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे