बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय


मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस तिकिटाव्यतिरिक्त उत्पन्न मिळवत नाही तोपर्यंत बेस्ट उपक्रमासमोरील आर्थिक समस्या कमी होणार नाही आणि नव्या बेस्ट महाव्यस्थापकानी असा प्रयत्न केल्यास राज्य सरकार त्याला संपूर्ण पाठिंबा देईल' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बेस्टच्या कुलाबा आगारातील नव्या १५७ वातानुकूलित विद्युत बसचे उद्घाटन मंगळवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , पालकमंत्री आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, वरिष्ठ अधिकारी भूषण गगराणी, बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांच्यासह बेस्टचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.


फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईतील परिवहन सेवा आधुनिक आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल पडले असून राज्य सरकारच्या ५ हजार नवीन बस आणण्याच्या घोषणेनुसार बेस्ट उपक्रमातील १५७ नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या देणे आणि प्रदूषण कमी करणे हे या मागील मुख्य उद्दिष्ट आहे. "बेस्टची सेवा एकप्रकारे जीवनवाहिनी आहे," असेही ते म्हणाले. यावेळी ओशिवरा येथील बसचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.


दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईत एकेकाळी ट्राम आणि बग्ग्या धावत होत्या, आज त्या ठिकाणी वातानुकूलित आणि पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. टप्प्याटप्प्याने सर्व बसेस पर्यावरणपूरक बनवण्याचा आमचा संकल्प आहे. हे केवळ वाहतुकीतील सुधारणा नसून मुंबईच्या विकासाचे हरित वळण आहे.” पूर्वीच्या सरकारच्या काळात बेस्ट सेवा डबघाईला आली होती, पण महायुती सरकार आल्यावर बेस्टला पुन्हा नवसंजीवनी मिळाली.


आधीच्या सरकारने बेस्टला वेस्ट केले, मात्र आम्ही ३ हजार ४०० कोटी रुपये निधी दिला असून यंदा आणखी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. “इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही फक्त सुरुवात असून, लवकरच आणखी मोठ्या प्रमाणावर पर्यावरण स्नेही वाहतूक सुविधा निर्माण केल्या जातील. ‘मुंबई वन ॲप’मुळे प्रवाशांना बसचे लाईव्ह लोकेशन, एकाच तिकिटावर विविध सेवा, तसेच दिव्यांग प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध होतील.” “सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नेहमीच नफ्याची नसते, पण ती जनतेच्या सोयीसाठी उत्कृष्ट आणि सुरक्षित बनवणे हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना महापालिके इतकाच दिवाळी बोनस देण्यात आला आहे.”

Comments
Add Comment

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान

Viral Video :चालत्या बाईकवर 'हायव्होल्टेज' ड्रामा!...लोक पाहत राहिलीत..!

मुंबई: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, पण सध्या एका अशा व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे जो पाहून

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच