एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि सेवा वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती मोहीम राबवित आहे. बँक येत्या काही महिन्यांत सुमारे ३,५०० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य विकास अधिकारी किशोर कुमार पोलुदासू यांनी दिली.


त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने जून महिन्यात ५०५ प्रोबेशनरी ऑफिसर्स (पीओ) ची भरती पूर्ण केली असून तितक्याच पदांसाठी प्रक्रिया सुरू आहे. तसेच, १,३०० आयटी आणि सायबरसुरक्षा तज्ज्ञ अधिकारी यांची निवड आधीच करण्यात आली आहे. आणखी ५४१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडते, प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मानसोपचार चाचणीसह मुलाखत असेल.


याशिवाय, पोलुदासू यांनी सांगितले की सुमारे ३,००० मंडळ आधारित अधिकाऱ्यांच्या भरतीचा विचार सध्या सुरू असून हे सर्व काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.


बँकेचे अध्यक्ष सी. एस. सेट्टी यांनी याआधी सांगितले होते की, चालू आर्थिक वर्षात विविध श्रेणींमध्ये एकूण १८,००० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी सुमारे १३,५०० लिपिक पदे, तर उर्वरित प्रोबेशनरी अधिकारी आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी असतील.


महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाबाबत बोलताना पोलुदासू म्हणाले की, एसबीआयने पाच वर्षांत महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ३३ टक्के आहे, तर एकूण कर्मचाऱ्यांमध्ये २७ टक्के आहे.


त्यांनी सांगितले की, बँक महिलांसाठी अनुकूल कार्यस्थळ निर्माण करण्यावर भर देत आहे. एसबीआय ‘एम्पॉवर हर’ सारख्या उपक्रमांद्वारे महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत असून, पाळणाघर भत्ता, ‘फॅमिली कनेक्ट’ कार्यक्रम, तसेच प्रसूती किंवा दीर्घ रजेवरून परतणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे.


सध्या एसबीआयमध्ये २.४ लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत असून ती देशातील सर्वात मोठी नियोक्ता संस्था म्हणून ओळखली जाते. बँकेचे उद्दिष्ट आहे की, महिलांना सर्व स्तरांवर संधी देऊन एक संतुलित, समावेशक आणि प्रेरणादायी कार्यसंस्कृती विकसित करणे, हे बँकेचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

मालाडला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम झाले जुने

मुंबई : मालाड परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मालाड टेकडी जलाशय-२ चे

महापौरांनी जाहीर केला १०० दिवसांचा कार्यक्रम

मुंबई: मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर

बहुप्रतिक्षित गारगाई धरणाच्या कामाला गती; तब्बल १.२ मेगावॅटर वीज निर्मिती प्रकल्पही उभारणार

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाला आता गती देण्यात येणार असून या धरण प्रकल्पाच्या कामासाठी

विक्रोळी,भांडुप-मुलुंडच्या एस अँड टी प्रभाग समिती अध्यक्षपदी भाजपच्या साक्षी दळवी

मुंबई: ‘एस आणि ‘टी' प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत चक्क पुन्हा एकदा उबाठाला मोठा धक्का बसला

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या