माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असून शिवसेना उबाठा गटाचे खेळाडू मॅचपूर्वीच मैदान सोडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उबाठासाठी बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता महायुतीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. ज्यात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.



२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेकजणांनी महायुतीची वाट धरली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवार, २८ ऑक्‍टोबर रोजी प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.




नागेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. उबाठा गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राठोड कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता राठोड यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीमध्ये उबाठा गटासाठी रायगडमध्ये मोठा खड्डा पडणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

West Bengal Assembly Election 2026 : ममता बॅनर्जींना मोठा झटका; मतदार यादीतून थेट ९०.६६ लाख नावे वगळली

- निवडणूक आयोगाकडून जिलानिहाय आकडेवारी जाहीर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेत (एसआयआर)

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार