माजी जिल्हा संपर्कप्रमुख भाजपच्या वाटेवर! कोकणात उबाठासाठी निर्माण झाली मोठी घळ

रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असून शिवसेना उबाठा गटाचे खेळाडू मॅचपूर्वीच मैदान सोडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उबाठासाठी बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता महायुतीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. ज्यात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.



२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेकजणांनी महायुतीची वाट धरली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवार, २८ ऑक्‍टोबर रोजी प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण यांच्‍या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.




नागेंद्र राठोड यांनी काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. उबाठा गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राठोड कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता राठोड यांनी भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकीमध्ये उबाठा गटासाठी रायगडमध्ये मोठा खड्डा पडणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar: अजित पवार शेवटी फोनवर काय बोलले, बारामतीतून मोठी माहिती समोर येणार

बारामती : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला

“महायुतीच्या एकजुटीपुढे कुणाचीही डाळ शिजणार नाही, सिंधुदुर्गात महायुतीच्या १०० टक्के विजयाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्धार

कुडाळच्या विराट सभेत तळ कोकणावर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन कुडाळ : कोकणात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ दिवसांचे? - नियोजन सुरू; विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर परिषदेत आशिष जयस्वाल मांडणार अर्थसंकल्प

मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूण २६ दिवसांचे असण्याची शक्यता असून, त्यापैकी सुट्ट्या

राज्यातील सर्व अपूर्ण विमानतळे ‘एमएडीसी’कडे देणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश; विमानतळ विकासात सिडको आणि नगरविकास विभागाचे सहकार्य घेणार

मुंबई : राज्यातील विमानतळ विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची (एमएडीसी) क्षमता वाढवून

औद्योगिक वापरासाठी सरकारी जमिनी आता विनामूल्य हस्तांतरित होणार - अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न; प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यात औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी विविध विभागांकडील शासकीय जमिनी औद्योगिक