रायगड: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वत्र सुरू आहे. यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले असून शिवसेना उबाठा गटाचे खेळाडू मॅचपूर्वीच मैदान सोडत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील उबाठा गटाच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उबाठासाठी बालेकिल्ला असलेल्या कोकणातही आता महायुतीमधील इनकमिंग वाढताना दिसत आहे. ज्यात रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर महाविकास आघाडीतील अनेकजणांनी महायुतीची वाट धरली. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान उबाठा गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये पक्षांतर करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत.
सोलापूर: सध्या राज्यात आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी ...





