भारताला मोठा धक्का! प्रतीका रावल दुखापतीमुळे विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर प्रतीका रावल हिला झालेल्या दुखापतीमुळे ती ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीतून बाहेर झाली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी ही फलंदाज आता अंतिम फेरीसाठीही अनिश्चित आहे.


बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रावलच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. २१ व्या षटकात शर्मिन अख्तरने दीप्ती शर्माच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटकडे फटका मारला. चेंडू अडवण्यासाठी रावल धावत असताना तिचा पाय अडकल्यासारखा झाला आणि ती जमिनीवर कोसळली. त्या क्षणी तिचा घोटा मुरगळला आणि ती वेदनेने तडफडू लागली. यानंतर ती रावल फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर गेली. नंतर ती फलंदाजीला उतरली नाही. त्या डावात स्मृती मानधना आणि अमनजोत कौर यांनी सलामी दिली. पावसामुळे सामना थांबण्यापूर्वी अमनजोतने नाबाद १५ धावा केल्या होत्या.


२५ वर्षीय रावलने या विश्वचषकात सहा डावांमध्ये ३०८ धावा केल्या आहेत, ५१.३३ च्या सरासरीने आणि ७७.७७ च्या स्ट्राइक रेटने. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७५ आणि न्यूझीलंडविरुद्ध शानदार १२२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्धच्या शतकानंतर ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणाऱ्या संयुक्त फलंदाजांपैकी एक ठरली. या स्पर्धेत तिच्या जोडीदार स्मृती मानधनानेच रावलपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.


रावल आणि मानधनाने मिळून या विश्वचषकातील टॉप पाच भागीदारींपैकी न्यूझीलंडविरुद्ध २१२ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५५ धावांची भागीदारी केली आहे.


उपांत्य फेरीत मानधनासोबत अमनजोत कौर, हरलीन देओल किंवा उमा छेत्री यांपैकी कोणतीही खेळाडू सलामी देऊ शकते. उमा छेत्रीने यापूर्वी सराव सामन्यात तसेच टी-२० क्रिकेटमध्ये सलामी दिली आहे. जेमिमा रॉड्रिग्जलाही सलामीचा अनुभव आहे.


रावलच्या पुनरागमनाबाबत किंवा अंतिम फेरीत खेळण्याबाबत सध्या अधिकृत घोषणा झालेली नाही. भारताच्या राखीव यादीत तेजल हसबनीस ही एकमेव अतिरिक्त फलंदाज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उपांत्य सामना ३० ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत खेळवला जाणार आहे.

Comments
Add Comment

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स

IPL 2026 : तेवतियाच्या बॅटवर पंचांचा आक्षेप! ऐन सामन्यातच बदलावी लागली बॅट

मुंबई : आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यात केवळ पराभवच नाही, तर एक वादग्रस्त

IPL 2026 : पदार्पणाच्या सामन्यातच कॉनॉलीचा ‘वन-मॅन शो’; पंजाबचा गुजरातवर ३ विकेट्स राखून विजय

आयपीएल २०२६ ची दमदार सुरुवात करत पंजाब किंग्सने न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथे गुजरात टायटन्सवर ३ गडी राखून

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट