मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने ८ विकेट्स गमावून ४०६ धावा केल्या होत्या. या विशाल धावसंख्येत मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे मोठे योगदान राहिले. रहाणेने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील ४२ वे फर्स्ट-क्लास शतक ठोकून आपल्या फॉर्मची प्रचिती दिली. रहाणेच्या शतकी खेळीमुळे मुंबई संघाने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
नवी मुंबई : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप २०२५ (ICC Women's ODI World Cup 2025) स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना अखेर पावसामुळे रद्द करावा लागला आहे. या सामन्यात टीम ...
अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी
मुंबई संघासाठी (Mumbai Team) अत्यंत महत्त्वाच्या क्षणी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ही अविस्मरणीय खेळी केली. मुंबईने अवघ्या ३८ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा रहाणे फलंदाजीला आला आणि त्याने एकहाती डाव सांभाळला. रहाणेने ३०३ चेंडूंचा सामना करत १५९ धावांची (159 Runs) शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीत २१ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, फलंदाजी करत असताना त्याला क्रॅम्प्सचा त्रास झाला आणि तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र, त्याने पुन्हा मैदानावर पुनरागमन करत आपली धावसंख्या वाढवली. या महत्त्वपूर्ण खेळीमुळे अजिंक्य रहाणेने आगामी काळात टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.
'वय फक्त एक नंबर': रहाणेचे टीम इंडिया पुनरागमनावर स्पष्टीकरण
रणजी करंडकातील आपल्या दमदार १५९ धावांच्या शतकी खेळीनंतर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने मीडियाशी संवाद साधताना टीम इंडियातील आपल्या पुनरागमनावर एक मोठे आणि स्पष्ट विधान केले. रहाणे म्हणाला, "मला माहिती आहे की मी किती चांगला खेळाडू आहे. मी बाहेरून होणाऱ्या टीका किंवा गडबड ऐकत नाही." अनुभवी खेळाडूच्या भूमिकेवर जोर देत तो म्हणाला, "माझे वैयक्तिक मत आहे की भारताला ऑस्ट्रेलियात (Australia) माझी आवश्यकता होती. अनुभवाचे सुद्धा एक महत्त्व आहे." वयामुळे होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रहाणेने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा दाखला दिला. "मी रोहित आणि विराट साठी खूप खुश आहे. त्यांच्या फलंदाजीवरून अनुभवाचे महत्त्व लक्षात येते. वय काय, फक्त एक आकडा आहे," असे ठाम मत रहाणेने व्यक्त केले. या विधानावरून रहाणे अजूनही भारतीय संघात मोठ्या भूमिकांसाठी तयार असल्याचे स्पष्ट होते.
अजिंक्य रहाणेचा राष्ट्रीय संघात परतण्याचा प्रयत्न
मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रहाणे जुलै २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर निवडकर्त्यांनी त्याला राष्ट्रीय संघात संधी दिलेली नाही. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, देशांतर्गत क्रिकेट सीजनमध्येही तो फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. तरीही, अजिंक्य रहाणेने हार मानलेली नाही. आपले वय केवळ एक 'आकडा' असल्याचे सांगत त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्याची अपेक्षा अजूनही कायम ठेवली आहे. त्याची अलीकडील रणजी ट्रॉफीतील शतकी खेळी याच प्रयत्नांचा भाग आहे.