Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला सामना खेळत आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळवले आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने ८ विकेट्स गमावून ४०६ धावा केल्या होत्या. या विशाल धावसंख्येत मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याचे मोठे योगदान राहिले. रहाणेने या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील ४२ वे फर्स्ट-क्लास शतक ठोकून आपल्या फॉर्मची प्रचिती दिली. रहाणेच्या शतकी खेळीमुळे मुंबई संघाने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.



अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी


मुंबई संघासाठी (Mumbai Team) अत्यंत महत्त्वाच्या क्षणी अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ही अविस्मरणीय खेळी केली. मुंबईने अवघ्या ३८ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा रहाणे फलंदाजीला आला आणि त्याने एकहाती डाव सांभाळला. रहाणेने ३०३ चेंडूंचा सामना करत १५९ धावांची (159 Runs) शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीत २१ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, फलंदाजी करत असताना त्याला क्रॅम्प्सचा त्रास झाला आणि तो रिटायर्ड हर्ट झाला होता. मात्र, त्याने पुन्हा मैदानावर पुनरागमन करत आपली धावसंख्या वाढवली. या महत्त्वपूर्ण खेळीमुळे अजिंक्य रहाणेने आगामी काळात टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी आपला दावा अधिक मजबूत केला आहे.



'वय फक्त एक नंबर': रहाणेचे टीम इंडिया पुनरागमनावर स्पष्टीकरण


रणजी करंडकातील आपल्या दमदार १५९ धावांच्या शतकी खेळीनंतर अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने मीडियाशी संवाद साधताना टीम इंडियातील आपल्या पुनरागमनावर एक मोठे आणि स्पष्ट विधान केले. रहाणे म्हणाला, "मला माहिती आहे की मी किती चांगला खेळाडू आहे. मी बाहेरून होणाऱ्या टीका किंवा गडबड ऐकत नाही." अनुभवी खेळाडूच्या भूमिकेवर जोर देत तो म्हणाला, "माझे वैयक्तिक मत आहे की भारताला ऑस्ट्रेलियात (Australia) माझी आवश्यकता होती. अनुभवाचे सुद्धा एक महत्त्व आहे." वयामुळे होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रहाणेने विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा दाखला दिला. "मी रोहित आणि विराट साठी खूप खुश आहे. त्यांच्या फलंदाजीवरून अनुभवाचे महत्त्व लक्षात येते. वय काय, फक्त एक आकडा आहे," असे ठाम मत रहाणेने व्यक्त केले. या विधानावरून रहाणे अजूनही भारतीय संघात मोठ्या भूमिकांसाठी तयार असल्याचे स्पष्ट होते.



अजिंक्य रहाणेचा राष्ट्रीय संघात परतण्याचा प्रयत्न


मुंबईचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याला टीम इंडियाकडून शेवटचा सामना खेळून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रहाणे जुलै २०२३ मध्ये भारताकडून शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर निवडकर्त्यांनी त्याला राष्ट्रीय संघात संधी दिलेली नाही. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत, देशांतर्गत क्रिकेट सीजनमध्येही तो फारशी चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. तरीही, अजिंक्य रहाणेने हार मानलेली नाही. आपले वय केवळ एक 'आकडा' असल्याचे सांगत त्याने टीम इंडियात पुनरागमन करण्याची अपेक्षा अजूनही कायम ठेवली आहे. त्याची अलीकडील रणजी ट्रॉफीतील शतकी खेळी याच प्रयत्नांचा भाग आहे.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.