तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्याचे प्रतीक मानला जातो. कार्तिक महिन्यात हा सोहळा साजरा केला जातो. तुळशीला भगवान विष्णूची प्रत्यक्ष रूप मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह साजरा करणे हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. घरातील स्त्रिया कुटुंबाच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना करतात.


तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह म्हणजे भक्ती, निष्ठा आणि धार्मिक समर्पणाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. ही परंपरा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे कारण या सोहळ्याद्वारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात, सामाजिक बांधिलकी दृढ होते आणि मुलांना परंपरेची जाण होते.



तुळशी विवाहाची तारीख आणि शुभ मुहूर्त २०२५


द्वादशी तिथीची सुरूवात: २ नोव्हेंबर २०२५, सकाळी ७:३१ वाजता


द्वादशी तिथीची समाप्ती: ३ नोव्हेंबर २०२५, सकाळी ५:०७ वाजता


महत्त्वाचे मुहूर्त:


सूर्योदय: ६:३४ वाजता


सूर्यास्त: ५:३५ वाजता


चंद्र उदय: ३:२१ दुपारी


ब्रह्म मुहूर्त: ४:५० – ५:४२ सकाळ


विजय मुहूर्त: १:५५ – २:३९ दुपारी


गोधूळ मुहूर्त: ५:३५ – ६:०१ संध्याकाळ


निशिता मुहूर्त: ११:३९ – १२:३१ रात्री


पूजा विधी


तुळस स्वच्छ करून घेणे, कुंडी किंवा वृंदावन सजवावे. शुभ मुहूर्तावर तुळशीला फुले, फळे, हार, हळद-कुंकू अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावावी. तुळशीच्या समोर श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा करावी. यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणाव्या आणि विवाह विधी पूर्ण करावा.आपल्या सोयीनुसार ब्राह्मणांना बोलावून विधी पार पाडावे किंवा स्वतःच घरातील मोठ्या मंडळींच्या मार्गदर्शनाने पूजा करावी.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी