तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्याचे प्रतीक मानला जातो. कार्तिक महिन्यात हा सोहळा साजरा केला जातो. तुळशीला भगवान विष्णूची प्रत्यक्ष रूप मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह साजरा करणे हे धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. घरातील स्त्रिया कुटुंबाच्या सुख समृध्दीसाठी प्रार्थना करतात.


तुळशीला विष्णूची पत्नी मानले जाते, त्यामुळे तिचा विवाह म्हणजे भक्ती, निष्ठा आणि धार्मिक समर्पणाचे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून भारतीय घरांमध्ये तुळशी विवाह करण्याची परंपरा आहे. ही परंपरा फक्त धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे कारण या सोहळ्याद्वारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येतात, सामाजिक बांधिलकी दृढ होते आणि मुलांना परंपरेची जाण होते.



तुळशी विवाहाची तारीख आणि शुभ मुहूर्त २०२५


द्वादशी तिथीची सुरूवात: २ नोव्हेंबर २०२५, सकाळी ७:३१ वाजता


द्वादशी तिथीची समाप्ती: ३ नोव्हेंबर २०२५, सकाळी ५:०७ वाजता


महत्त्वाचे मुहूर्त:


सूर्योदय: ६:३४ वाजता


सूर्यास्त: ५:३५ वाजता


चंद्र उदय: ३:२१ दुपारी


ब्रह्म मुहूर्त: ४:५० – ५:४२ सकाळ


विजय मुहूर्त: १:५५ – २:३९ दुपारी


गोधूळ मुहूर्त: ५:३५ – ६:०१ संध्याकाळ


निशिता मुहूर्त: ११:३९ – १२:३१ रात्री


पूजा विधी


तुळस स्वच्छ करून घेणे, कुंडी किंवा वृंदावन सजवावे. शुभ मुहूर्तावर तुळशीला फुले, फळे, हार, हळद-कुंकू अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती लावावी. तुळशीच्या समोर श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा करावी. यानंतर अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणाव्या आणि विवाह विधी पूर्ण करावा.आपल्या सोयीनुसार ब्राह्मणांना बोलावून विधी पार पाडावे किंवा स्वतःच घरातील मोठ्या मंडळींच्या मार्गदर्शनाने पूजा करावी.

Comments
Add Comment

ग्राहक संरक्षण कायद्यात बदल करण्याची ग्राहक पंचायतची मागणी

मुंबई  : देशातील ग्राहक न्यायालयांमध्ये सध्या साडेपाय लाखांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. सुनावणीदरम्यान

नवीन कामगार कायद्यांमुळे वेतन कमी होणार नाही; केंद्राचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : देशात नवीन कामगार कायदे लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होईल, अशी चिंता सध्या

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३ कोटींच्या जुन्या नोटा जप्त

नवी दिल्ली  : नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. दोन

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

रॅपिडो प्रवासात तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, तरुणीच्या धैर्यामुळे अनर्थ टळला

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिमेतील सिंधी गेट परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय