'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी अवघ्या ३५ वर्षाची असून जुजुत्सू खेळात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहिणीची लहान बहीण रोशनीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडला होता. रोहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात आता खळबळ उडाली आहे.


रोहिणीची लहान बहीण रोशनीने सांगितलं की, रोहिणी सध्या एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच या पदावर कार्यरत होती. तिचे शाळेत काही वाद सुरु होते. ती शनिवारी घरी आली, त्यावेळी नाराज असल्याची दिसली. तसेच रोहिणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिचे फोनवर कोणासोबत तरी बोलणे झाले होते. यानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. हा फोन कोणाचा याबद्दल अजून माहिती मिळाली नाही. दरम्यान तिची आई आणि बहीण सकाळी देवदर्शनाला गेले होते. तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसताना रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.




रोहिणीने आत्महत्या का करत आहे? याबद्दल कोणाशीच काहीच संवाद साधला नाही. अथवा कोणती चिठ्ठीदेखील लिहीली नाही. त्यामुळे आता केवळ त्या एका फोन नंबरवरून पोलिसांना तपास करावा लागणार आहे. या प्रकरणाबाबत मध्यप्रदेशच्या बँक नोट प्रेस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.



रोहिणीने हाँगझोऊमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते. या व्यतिरिक्त तिने भारतासाठी अनेक पदके जिंकली होती. थायलँडमध्ये झालेल्या ओपन ग्रँड प्रिक्समध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. तर बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत ४८ किलोग्रॅम वजनाच्या गटात कांस्यपदक पटकावले होते.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला