'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी अवघ्या ३५ वर्षाची असून जुजुत्सू खेळात तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहिणीची लहान बहीण रोशनीच्या घरात लटकलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिने प्राण सोडला होता. रोहिणीच्या या चुकीच्या निर्णयामुळे क्रीडा विश्वात आता खळबळ उडाली आहे.


रोहिणीची लहान बहीण रोशनीने सांगितलं की, रोहिणी सध्या एका खासगी शाळेत मार्शल आर्ट कोच या पदावर कार्यरत होती. तिचे शाळेत काही वाद सुरु होते. ती शनिवारी घरी आली, त्यावेळी नाराज असल्याची दिसली. तसेच रोहिणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिचे फोनवर कोणासोबत तरी बोलणे झाले होते. यानंतर ती खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला. हा फोन कोणाचा याबद्दल अजून माहिती मिळाली नाही. दरम्यान तिची आई आणि बहीण सकाळी देवदर्शनाला गेले होते. तर वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नसताना रोहिणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते.




रोहिणीने आत्महत्या का करत आहे? याबद्दल कोणाशीच काहीच संवाद साधला नाही. अथवा कोणती चिठ्ठीदेखील लिहीली नाही. त्यामुळे आता केवळ त्या एका फोन नंबरवरून पोलिसांना तपास करावा लागणार आहे. या प्रकरणाबाबत मध्यप्रदेशच्या बँक नोट प्रेस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे.



रोहिणीने हाँगझोऊमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केले होते. या व्यतिरिक्त तिने भारतासाठी अनेक पदके जिंकली होती. थायलँडमध्ये झालेल्या ओपन ग्रँड प्रिक्समध्ये तिने चांगली कामगिरी केली होती. तर बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत ४८ किलोग्रॅम वजनाच्या गटात कांस्यपदक पटकावले होते.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील