दिल्लीत २० वर्षीय विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला !

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर तिच्याच परिचित असलेल्या तरुणाने दोन मित्रांच्या मदतीने ॲसिड हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.


पीडित विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेज, अशोक विहार येथे ट्युशनसाठी जात असताना हा हल्ला झाला. ती रस्त्याने जात असताना मुकुंदपूरचा रहिवासी जितेंद्र आणि त्याचे दोन साथीदार ईशान आणि अरमान यांच्यासह मोटारसायकलवर आला. पोलिसांच्या माहितीनुसार, ईशानने अरमानला ॲसिडची बाटली दिली आणि अरमानने ती विद्यार्थिनीवर फेकली. विद्यार्थिनीने चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे दोन्ही हात गंभीररित्या भाजले. हल्ल्यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले.


प्राथमिक तपासात उघड झाले आहे की, जितेंद्र गेल्या काही दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. सुमारे एक महिन्यापूर्वी याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला होता. पोलिसांच्या मते, त्याच रागातून जितेंद्रने आपल्या मित्रांसह हा भयंकर हल्ला केला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास घडली.


घटनेनंतर नागरिकांनी जखमी विद्यार्थिनीला तातडीने दीपचंद बंधू रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन क्राईम ब्रांच आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या टीमला घटनास्थळी पाठवले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या अटकेसाठी विविध पथके कार्यरत आहेत.


या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

Best Budget Bike : दिखाऊपणा कशाला? ७० किमी मायलेज आणि ५५ हजारांपासून किंमत; बजेटमधील ५ सर्वोत्तम बाईक!

सध्याच्या काळात महागाई आणि सतत वाढणारे इंधनाचे दर यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरि

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Panchkula Murder Case : पंचकुलात खळबळ! मोलकरणीनेच केली रिटायर्ड कॅप्टनच्या पत्नीची हत्या; सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले

Haryana : हरियाणामधील पंचकुला येथे घडलेल्या एका थरारक आणि खळबळजनक हत्याप्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

Eknath Shinde : 'शिवसेना कोणाची?' जनतेनेच दिला कौल; ४० चे ६० आमदार करून जनतेने शिक्कामोर्तब केलं

मुंबई : शिवसेना पक्षाच्या मालकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी