फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, आरोपी PSI गोपाळ बदनेचा ४८ तासांचा थरार, सोलापूर ते बीडपर्यंतचा प्रवास उघड

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येने राज्य हादरले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये त्यांनी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नोटमध्ये बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख असून, या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.


डॉ. मुंडे यांच्या मृत्यूनंतर आरोपी पीएसआय गोपाळ बदने फलटणमधून फरार झाला. त्याने आपला मोबाईल बंद करून पोलिसांना चकवा दिला. पोलिसांनी सुरुवातीला त्याचा शेवटचा ठावठिकाणा पंढरपूर परिसरात असल्याचे शोधले. त्यानंतर तो सोलापूरमार्गे बीड येथे आपल्या घरी पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस तपासात उघड झाले की, बदने हा दोन दिवसांपर्यंत विविध ठिकाणी फिरत राहिला आणि या काळात त्याने आपल्या मोबाईलमधील काही महत्त्वाचे पुरावे डिलीट केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही बदनेचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना बडतर्फीचा इशारा दिल्यानंतर त्याने शरणागती पत्करली. आश्चर्याची बाब म्हणजे, फरार असतानाही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फलटण पोलिसांशी संपर्कात होता. या काळात त्याने काही विशिष्ट पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचीही माहिती समोर आली आहे.


तपासादरम्यान बदनेने चौकशीत आपल्यावरचे आरोप फेटाळले आणि डॉ. मुंडे यांच्यावर कोणताही अत्याचार केला नाही असा दावा केला. मात्र, त्यांच्या दोघांमधील संबंधांचे स्वरूप काय होते, यावर तो मौन बाळगत आहे. सध्या पोलिस बदनेला बीडपर्यंत पोहोचवण्यात कोणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय वर्तुळ आणि पोलिस विभागात चर्चेचे वादळ उठले आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूमागील सत्य आणि आरोपींना कोणाचा पाठिंबा होता, हे समोर येण्यासाठी पोलिस तपास वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

'पिट्या भाई'ने कमळ घेतले हाती! अभिनेता रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: 'मुळशी पॅटर्न' चित्रपट फेम पिट्या भाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशीने आता कमळ हाती घेतले आहे. काही

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही