दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी समस्या निर्माण करत आहे. पुणे-सातारा मार्गावर जवळपास 50 किलोमीटरच्या पट्ट्यात वाहनांची गती मंदावलेली आहे. प्रवाशांना तासन्‌तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे, तर लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


हायवेवर वाहतुकीच्या कोंडीचे मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी रुंदीकरणाचे अपूर्ण काम आणि काही भागांमध्ये वाहतुकीसाठी दिलेल्या डायव्हर्जनमुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना नेहमीच्या दोन ते तीन तासांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागतो आहे, अशी अनेक वाहनचालकांनी तक्रार केली.


टोलनाक्यांवरही आज संपूर्ण दिवस वाहतूक खूप जास्त प्रमाणात दिसून आली. विशेषतः कोल्हापूरकडून पुणे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दुपारपासून मोठी गर्दी होती. काही प्रवाशांनी सांगितले की, “आम्ही मागील दोन तासांपासून हायवेवर अडकलेलो आहोत, रांग कधी संपणार तेच कळत नाही. मुलांसह प्रवास अतिशय त्रासदायक झाला आहे.”


प्रशासनाने आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काही ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या विशेष पथकांची तैनाती केली आहे. तरीही, दिवाळीनंतरच्या परतीच्या प्रवासामुळे पुढील दोन–तीन दिवसांपर्यंत हायवेवर गर्दी कायम राहण्याची शक्यता आहे.


अपूर्ण रुंदीकरण, वाढलेली वाहनसंख्या आणि व्यवस्थापनातील त्रुटी ही ही परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनवत आहेत. नागरिकांचा असा आग्रह आहे की, महामार्ग प्राधिकरण आणि पोलिसांनी तातडीने अतिरिक्त पथके तैनात करून वाहतुकीचे नियंत्रण मजबूत करावे.

Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी