फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, थोडी जरी शंका असती..

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिला मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख करत प्रशांत बनकर याचे नाव घेतले होते. पोलिसांनी तत्काळ प्रशांत बनकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना अटक केली असून बदने यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेवरून भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर काहीं कडून आरोप करण्यात आले, मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.


फडणवीस म्हणाले, “परवा आमची एक लहान बहिण जी डॉक्टर होती, तिचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली आणि तिच्या हातावरच आत्महत्येचं कारण लिहून ठेवलं. पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून सत्य बाहेर येत आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत या भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”


राजकीय आरोपांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होतो आहे. काहीही कारण नसताना रणजित दादा आणि सचिन दादांचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द केला असता.” फडणवीस पुढे म्हणाले, “जिथे माझ्या धाकट्या बहिणीचा विषय आहे, तिथे मी कोणतीही तडजोड करणार नाही. पण जर कोणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात असेल आणि राजकारण करत असेल, तर तेही मी सहन करणार नाही.” मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं असून तपास पूर्णपणे निःपक्षपाती पद्धतीने होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

महापालिकेच्या निवडणुकीआधीच मुंबईतला राष्ट्रवादीचा चेहरा पडला

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच महापालिकांच्या

अखेर अनमोल बिश्नोईच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या, भारतात आणण्याच्या प्रक्रियेला वेग!

नवी दिल्ली : गँगस्टर अनमोल बिश्नोईचे अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात भारतीय यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे अशी

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

एनडीए बिहारमध्ये पास, दिल्ली आणि महाराष्ट्रात 'स्थानिक'च्या परीक्षेसाठी सज्ज

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने २४३ पैकी २०२ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली. एनडीए बिहार