श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक बोया किनाऱ्यावर आढळली. ही अनोळखी बोया पाहून नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत मेरीटाईमचे कर्मचारी नितेश तांबे यांनी तात्काळ पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर श्रीवर्धन पोलीस व मेरीटाइम बोर्डाचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन दखल घेतली. तसेच रायगड पोलिसांचे ब्रुनो हे श्वानपथक पाचरण करून तपास करण्यात आला.


मेरिटाईम बोर्डाचे निलेश तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार,रायगड मधील बागमांडला ते रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट दरम्यान खाडी पुलाच्या पिलरचे काम चालू आहे. यावेळी बाणकोट सागरी पोलीस ठाणे हद्दीत एक बार्ज बुडाली होती. ती बुडालेले बार्ज समुद्रातून वर खेचण्याकरिता ओहोटीच्या वेळेस बार्जला बोया बांधून ठेवण्यात आली होती. ज्यामुळे भरतीच्या वेळेला लाटांच्या आधाराने बार्ज तरंगत असताना बाहेर काढता येईल. यासाठी बोयाचा वापर केला होता. परंतु हवामान खराब असल्याने बोयाचा दोर तुटून ती समुद्रात भरकटून गेली. असे बुडालेल्या बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांनी सांगितले.



किनाऱ्यावर बोया आढळून आल्यावर श्रीवर्धन मेरिटाईम बोर्ड अधिकाऱ्यांनी बार्जचे मालक अब्दुल रजाक अन्सारी यांना संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. ही बोया आता श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर आढळली आहे.

Comments
Add Comment

Pune Crime : धक्कादायक ! शरीरात दैवी शक्तीचा वास असल्याचं भासवून महिलेवर अत्याचार

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात एका भोंदूबाबानं चक्क अंगात देवी

Raja Shivaji : आशा भोसलेंच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा, 'राजा शिवाजी' सिनेमाबद्दल रितेशनं घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या बहुप्रतिक्षित सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. या सिनेमाचा

Solapur News : झाडाला बांधलेली दोरी सुटली आणि... सख्ख्या भावंडांवर काळाचा घाला

सोलापूर : सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अंकलगी वस्तीवरील शेततळ्यात बुडून

Mumbai Local : आता पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार अधिक सोयीस्कर, लवकरच या स्थानकांवर धावणार 15 डब्यांची लोकल

मुंबई : पश्चिम रेल्वेचा प्रवास लवकरच अधिक सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील विरार ते डहाणूदरम्यान १९९४

Asha Bhosle : दुसरा जन्म मिळाला तर, पुन्हा आशा भोसलेच व्हायला आवडेल का?

गायिका आशा भोसले यांना एकदा मुलाखतीमध्ये विचारलेले की, दुसरा जन्म मिळाला तर तुम्हाला आशा भोसलेच व्हायला आवडेल

पं. हृदयनाथ मंगेशकरांचे भाषण अन् भावविवश आशाताई

'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात राष्ट्रीय सरसंघचालक मोहन