कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या तपासणी दरम्यान दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात बसला लागलेल्या भीषण आगीमुळे २० जणांचा मृत्यू झाला होता.



या अपघातात एक दुचाकी बसखाली आल्याने तिची इंधन टाकी फुटली आणि बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकताच फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. ज्यात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यारात्री २ वाजता शंकर आणि एरी स्वामी हे लक्ष्मीपुरम गावातून तुग्गली गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी एका ढाब्यावर जेवण केले होते. जेथे स्वामीने दारू प्यायल्याचे कबूल केले आहे. कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल भरल्यानंतर शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत होता. थोड्याच वेळात त्यांची दुचाकी घसरली आणि शंकर उजव्या बाजूला पडून डिव्हाईडरला धडकला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.



शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह