कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. या तपासणी दरम्यान दोन मद्यधुंद दुचाकीस्वारांच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यात बसला लागलेल्या भीषण आगीमुळे २० जणांचा मृत्यू झाला होता.



या अपघातात एक दुचाकी बसखाली आल्याने तिची इंधन टाकी फुटली आणि बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, कुर्नूल रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) कोया प्रवीण पीटीआयसोबत बोलतना म्हणाले, "आम्हाला नुकताच फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला. ज्यात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती (शिव शंकर आणि एरी स्वामी) नशेत असल्याचे स्पष्ट झाले आहे." महत्वाचे म्हणजे, पोलिसांना हे माहीत होते. पण, पोलीस या वस्तुस्थितीचा फॉरेन्सिक रिपोर्ट येण्याची वाट पाहत होते, असेही ते म्हणाले.






पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यारात्री २ वाजता शंकर आणि एरी स्वामी हे लक्ष्मीपुरम गावातून तुग्गली गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान दोघांनी एका ढाब्यावर जेवण केले होते. जेथे स्वामीने दारू प्यायल्याचे कबूल केले आहे. कुर्नूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितले की, पेट्रोल भरल्यानंतर शंकर बेपर्वाईने दुचाकी चालवत होता. थोड्याच वेळात त्यांची दुचाकी घसरली आणि शंकर उजव्या बाजूला पडून डिव्हाईडरला धडकला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.



शंकरचा मृत्यू झाल्याचे पाहिल्यानंतर स्वामी दुचाकी रस्त्यावरून बाजूला करण्याच्या विचारात असतानाच, मागून येणारी भरधाव बस दुचाकीवरून गेली. तिच्यासोबत ती दुचाकीही काही अंतरापर्यंत घसरत गेली. यामुळेच बसने पेट घेतला. बसला आग लागल्यानंतर भयभीत झालेला स्वामी तेथून पळून गेला. या नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.

Comments
Add Comment

Narendra Modi : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र

Supreme Court : लाठीचार्जविरोधातील दोन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २७ जुलैला सुनावणी

नवी दिल्ली: पेपर लीक प्रकरणाविरोधात रस्त्यावर उतरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर

Kusha’ missile : लांब पल्ल्याच्या ‘कुशा’ क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी

भारताची ऐतिहासिक झेप ; हवाई सुरक्षा यंत्रणा होणार अधिक मजबूत नवी दिल्ली : भारत आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी

Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...

शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे.

Major Supreme Court decision : न्यायालयाच्या कामकाजाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी, परवानगीशिवाय शेअर केल्यास होणार कारवाई

नवी दिल्ली: न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि थेट प्रक्षेपणाचे (लाइव्ह-स्ट्रीम) चित्रीकरण

Zero's History : शून्याचा पहिला पुरावा कुठे सापडला? भारतातील 'या' प्राचीन मंदिराचा इतिहास जाणून घ्या

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अंकांमध्ये शून्य (Zero) हा सर्वात महत्त्वाचा अंक मानला जातो. बँकिंग (Banking), संगणक (Computer),