फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित


नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक मोठा बदल केला आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० च्या अनुषंगाने, इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी किमान वय ६+ वर्षे निश्चित केले आहे. हा नवीन नियम २०२६-२७ सत्रापासून राजधानीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये लागू केला जाईल. शिक्षण संचालनालयाने (डीओई) जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पायाभूत टप्प्यासाठीची रचना आणि प्रवेश वयोमर्यादा टप्प्याटप्प्याने सुधारित केली जाईल.


नवीन वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल (३१ मार्चच्या वयानुसार):


ज्युनिअर केजी (बालवाडी-२/प्री-स्कूल-२): ४ ते ५ वर्षे
सिनिअर केजी (बालवाडी-३/प्री-स्कूल-३): ५ ते ६ वर्षे
इयत्ता पहिली : ६ ते ७ वर्षे
तथापि, शाळा प्रमुखांना किमान आणि कमाल वयोमर्यादा एक महिन्यापर्यंत शिथिल करण्याचा अधिकार असेल. चालू सत्रातील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होणार नाही. परिपत्रकात असे स्पष्ट केले आहे की, नवीन वयोमर्यादा २०२५-२६ सत्रातील विद्यार्थ्यांवर होणार नाही. विद्यमान नर्सरी, केजी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थी पुढील सत्रात विद्यमान रचनेनुसार सुरू राहतील.


नवीन रचना २०२७-२८ पासून लागू
२०२७-२८ पासून नवीन शैक्षणिक रचना पूर्णपणे लागू केली जाईल, जेव्हा ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजी वर्ग सुरू होतील. या वर्गांमध्ये प्रवेश नवीन वयोमर्यादेनुसार असेल. मागील शाळेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूट
मान्यताप्राप्त शाळेतून मागील वर्ग उत्तीर्ण झालेल्या आणि त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला (एसएलसी) आणि गुणपत्रिका असलेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादेतून सूट दिली जाईल.
शिक्षण संचालनालयाने सर्व शाळा प्रमुखांना या बदलांबद्दल पालकांना स्पष्टपणे माहिती देण्याचे आणि नवीन वयोमर्यादेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या