मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो प्रवासातील ही झोप महागात पडू शकते.गाडीने प्रवास म्हटलं की डुलकी किंवा झोप आलीच. ऑफिससाठी दररोज प्रवास करणारे कितीतरी प्रवासी प्रवासात झोपतात. पण मेट्रोमध्ये अशी झोप काढणं तुम्हाला महागात पडू शकतं. अशी एक मेट्रो आहे ज्यात तुम्हाला झोपण्यास मनाई आहे. चुकूनही तुम्ही झोपलात तर तुम्हाला दंड बसू शकतो. थोडाथोडका नव्हे तर हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. मेट्रोमध्ये प्रवास करताना जमिनीवर बसणं, आडवं होणं, गेटसमोर उभं राहणं किंवा बसणं, सीटवर पाय वर करून बसणं, सीट झोपणं यास सक्त मनाई आहे. हा नियम दुबई मेट्रोचा आहे. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका प्रवाशाच्या पोस्टनंतर, दुबई मेट्रोचे हे नियम पुन्हा चर्चेत आले आहेत. दुबई मेट्रोच्या नियमांनुसार, प्रवास करताना जर तुम्ही जमिनीवर बसलात किंवा झोपलात तर तुम्हाला १०० ते ३०० दिरहमपर्यंत दंड होऊ शकतो. भारतीय रुपयात ही रक्कम सुमारे २,५०० ते ७,५०० रुपये आहे.

Comments
Add Comment

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने