लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन सुधारते असा विश्वास आहे. पण तज्ज्ञांचे मत आहे की, या दाव्यात तथ्य नाही. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, लिंबू पाण्याचे योग्य प्रकारे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा ‘मॅजिक पोशन’ म्हणून विचार करणे योग्य नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लिंबू पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु ते थेट शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकत नाही किंवा थेट चरबी कमी करू शकत नाही.



लिंबू पाणी पिण्याचे फायदे :


१. लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. हायड्रेशन आणि पचनसाठी हे एक चांगले पेय आहे.
३. त्याची आंबट चव ज्यांना साधे पाणी पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी साध्या पाण्याचा एक चांगला पर्याय बनवते.
४. लिंबाच्या रसातील आम्ल पोटाला पाचक एंजाइम तयार करण्यास मदत करू शकते.
५. लाळेच्या उत्पादनास देखील उत्तेजन देते.



प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न फायदा :


लिंबू सरबताचा फायदा प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतो. लिंबू सरबताचे प्रमाण आणि वेळ लक्षात घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदा लिंबू सरबत पिणे हिताचे ठरू शकते.



लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते ?


लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते असा एक सामान्य समज आहे, परंतु तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत नाहीत. हे पेय प्यायल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि जर आपण ते गोड पदार्थाशिवाय प्यायले तर ते आपल्यातल्या एकूण कॅलरीचे प्रमाण कमी करू शकते. तज्ज्ञांनी यावर जोर दिला आहे की हे पेय चरबी कमी करणारे नाही. ज्या लोकांना आधीपासूनच अ‍ॅसिडीटी , जठराची सूज किंवा अल्सर यासारख्या समस्या आहेत त्यांनी लिंबाचे पाणी पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लिंबामधील सायट्रिक ऍसिड पोटाच्या आतील अस्तराला त्रास देऊ शकते. ज्यांना आधीच आंबटपणा किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या आहेत त्यांच्यासाठी लिंबाचे पाणी हे नुकसानकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा