लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन सुधारते असा विश्वास आहे. पण तज्ज्ञांचे मत आहे की, या दाव्यात तथ्य नाही. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, लिंबू पाण्याचे योग्य प्रकारे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा ‘मॅजिक पोशन’ म्हणून विचार करणे योग्य नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लिंबू पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु ते थेट शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकत नाही किंवा थेट चरबी कमी करू शकत नाही.



लिंबू पाणी पिण्याचे फायदे :


१. लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. हायड्रेशन आणि पचनसाठी हे एक चांगले पेय आहे.
३. त्याची आंबट चव ज्यांना साधे पाणी पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी साध्या पाण्याचा एक चांगला पर्याय बनवते.
४. लिंबाच्या रसातील आम्ल पोटाला पाचक एंजाइम तयार करण्यास मदत करू शकते.
५. लाळेच्या उत्पादनास देखील उत्तेजन देते.



प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न फायदा :


लिंबू सरबताचा फायदा प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतो. लिंबू सरबताचे प्रमाण आणि वेळ लक्षात घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदा लिंबू सरबत पिणे हिताचे ठरू शकते.



लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते ?


लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते असा एक सामान्य समज आहे, परंतु तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत नाहीत. हे पेय प्यायल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि जर आपण ते गोड पदार्थाशिवाय प्यायले तर ते आपल्यातल्या एकूण कॅलरीचे प्रमाण कमी करू शकते. तज्ज्ञांनी यावर जोर दिला आहे की हे पेय चरबी कमी करणारे नाही. ज्या लोकांना आधीपासूनच अ‍ॅसिडीटी , जठराची सूज किंवा अल्सर यासारख्या समस्या आहेत त्यांनी लिंबाचे पाणी पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लिंबामधील सायट्रिक ऍसिड पोटाच्या आतील अस्तराला त्रास देऊ शकते. ज्यांना आधीच आंबटपणा किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या आहेत त्यांच्यासाठी लिंबाचे पाणी हे नुकसानकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे