वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच वैमानिकाला काहीतरी तांत्रिक गडबड असल्याचे जाणवले यामुळे विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. वैमानिकाच्या या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. या विमानात एकूण १६० प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांचे तिकीटाचे पैसे परत देण्यात येणार आहेत.


एअर इंडियाच्या नागपूर-दिल्ली (विमान क्रमांक एआय ४६६) या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच काही अंतरावर पक्षी धडकल्याचा प्रकार शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला. यावेळी पायलटच्या प्रसंगावधनाने कुठलीही दुर्घटना घटली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.




एखादा पक्षी विमानाला धडकला असावा, अशी शक्यता व्यक्त करत वैमानिकाने विमान परत नागपूर विमानतळावर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, येथील एटीसीशी संपर्क साधण्यात आला. हे विमान हिंगण्याच्या दिशेने सुराबर्डी, फेटरी, कळमेश्वर, सावनेरपर्यंत पोहचले होते. तेथून पाटणसावंगी, कोराडी, कामठी या मार्गाने विमान नागपूर विमानतळावर उतरले. वैमानिकाने घेतलेल्या निर्णयामुळे दुर्घटना टळली.



यापूर्वी २ सप्टेंबर २०२५ रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूर-कोलकाता विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर लगेच दोन महिन्यांत हा दुसरा प्रकार घडला आहे.

Comments
Add Comment

पाल-खंडोबा यात्रेसाठी एसटीची जय्यत तयारी

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात भाविकांच्या श्रद्धेचा महासागर उसळणार असून, त्या महासागराला सुरक्षित,

अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची तीन एकर जमीन

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मौजे चिखलदरा येथील श्री. अंबादेवी संस्थान, अमरावती यांना महाराष्ट्र पर्यटन विकास

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या गड किल्ल्यांवर जाण्यास बंदी; वन विभागाचा आदेश जारी

पुणे : अनेकजण नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ३१ डिसेंबरच्या रात्री गडकिल्ल्यावर जाणे पसंत करतात. या पार्श्वभूमीवर

मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून सरकारचे खास पाऊल

मुंबई: आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास