वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच वैमानिकाला काहीतरी तांत्रिक गडबड असल्याचे जाणवले यामुळे विमान परत नागपूर विमानतळावर उतरवण्यात आले. वैमानिकाच्या या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. या विमानात एकूण १६० प्रवासी होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांचे तिकीटाचे पैसे परत देण्यात येणार आहेत.


एअर इंडियाच्या नागपूर-दिल्ली (विमान क्रमांक एआय ४६६) या विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताच काही अंतरावर पक्षी धडकल्याचा प्रकार शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडला. यावेळी पायलटच्या प्रसंगावधनाने कुठलीही दुर्घटना घटली नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली.




एखादा पक्षी विमानाला धडकला असावा, अशी शक्यता व्यक्त करत वैमानिकाने विमान परत नागपूर विमानतळावर आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, येथील एटीसीशी संपर्क साधण्यात आला. हे विमान हिंगण्याच्या दिशेने सुराबर्डी, फेटरी, कळमेश्वर, सावनेरपर्यंत पोहचले होते. तेथून पाटणसावंगी, कोराडी, कामठी या मार्गाने विमान नागपूर विमानतळावर उतरले. वैमानिकाने घेतलेल्या निर्णयामुळे दुर्घटना टळली.



यापूर्वी २ सप्टेंबर २०२५ रोजी इंडिगो एअरलाइन्सच्या नागपूर-कोलकाता विमानाला पक्षी धडकला होता. त्यानंतर लगेच दोन महिन्यांत हा दुसरा प्रकार घडला आहे.

Comments
Add Comment

Special Trains :नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून धावणार विशेष गाड्या

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५

पुण्यात डिजिटल अरेस्टची धमकी देत, ज्येष्ठ नागरिकाची कोटींची फसवणूक

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधींचा

नाशिक महापौरपदासाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपमधील तीन प्रभावी चेहरे चर्चेत

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीनंतर नाशिकच्या सत्तावर्तुळात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्पष्ट संख्याबळासह

Amrit Bharat Express Train Routes : मुंबईकरांची चांदी! 'अमृत भारत एक्सप्रेस'ने लांब पल्ल्याचा प्रवास होणार स्वस्त; जाणून घ्या कुठे-कुठे थांबणार गाडी?

मुंबई : भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी सुरू केलेल्या 'अमृत भारत एक्सप्रेस' ताफ्यात आता आणखी ९

Ashish Jaiswal : आमदार आशिष जयस्वाल यांच्या पाठपुराव्याला यश; प्रकल्पबाधित तरुण दिनेश हावरे यांचा पोलीस सेवेतील मार्ग मोकळा!

सातारा : नियम आणि प्रशासकीय तांत्रिकतेच्या कचाट्यात अडकलेल्या एका होतकरू तरुणाच्या आयुष्यात अखेर आशेचा नवा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाची औपचारिकता पूर्ण होणार

स्थायी समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आयुक्त मांडणार अर्थसंकल्प मुंबई : मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७चा