मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झालेली ही मेट्रो मुंबईची पहिली पूर्णपणे जमिनीखालून (Underground) जाणारी आहे. ही मेट्रो आरे कॉलनी ते बीकेसी पर्यंत जाते आणि ती विमानतळाला (Airport) जोडते. पण विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या बॅग्स घेऊन पायऱ्यांवरून खाली उतरावे लागते, कारण उतरण्यासाठी सरकते जिने नाहीत. स्टेशनच्या बाहेरही चांगले रस्ते (पेंवमेंट) नाहीत.


अनेक मुंबईकरांनी देखिल त्यांचे वाईट अनुभव सोशल मीडियावर सांगितले. एका प्रवाशाने सांगितले की, त्याला २५ किलोची बॅग स्वतः खाली घेऊन यावी लागली. दुसऱ्या एका युजरने गमतीत म्हटले की, "आपला देश खाली उतरण्यावर विश्वास ठेवत नाही." मात्र, काही लोकांनी मेट्रोचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अवजड सामानासाठी लिफ्ट आहेत, ज्या अजूनही बसवण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना आशा आहे की, मेट्रोचे अधिकारी लोकांचा हा त्रास लवकरच दूर करतील.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल