उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rachin Ravindra : केकेआरला मोठा धक्का ! एकही सामना न खेळता स्टार खेळाडू हंगामातून बाहेर

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये केकेआरने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या हंगामात ११ पैकी चार सामने जिंकत ९ गुण मिळवले

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ५ तासांचा ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीच्या दरम्यान, दादर स्थानकात ब्लॉक असणार आहे. हा ब्लॉक इलेक्ट्रॉनिक

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून प्रारंभ

प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Chandrashekhar Bawankule : महसूल विभागातील सुनावण्यांसाठी 'एसओपी' - सुनावण्यांच्या संपूर्ण कामकाजासह निकालपत्रे मराठी भाषेतूनच बंधनकारक

New Jail In Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात ११ एकर भूखंडावर उभारणार नवे कारागृह

मुंबई : राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण आणि कैद्यांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल; मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक गतिमान करण्यासाठी आणि तपास यंत्रणांना नवी दिशा देण्यासाठी गृह विभागाने