मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात समुद्राची नैसर्गिक खोली देशात सर्वात जास्त आहे. या बंदराच्या संरक्षणासाठी आणि समुद्राच्या लाटांना रोखण्यासाठी समुद्रात एक मोठी भिंत बांधली जाणार आहे.


ही भिंत १०.७४ किलोमीटर लांब असेल आणि ती देशातील सर्वात लांब समुद्राची भिंत ठरणार आहे.


वाढवण बंदर हे डहाणूजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर येत आहे. या बंदरामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील जागतिक व्यापार आणि मालवाहतूक करणे खूप सोपे होईल. मग आपल्याला कोलंबो आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय बंदरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.


या बंदरात ६,१०० एकर जागा समुद्रात भरणी (माती टाकून) करून तयार केली जाणार आहे. हे बंदर मुंबई-अहमदाबाद, जेएनपीटी-दिल्ली आणि समृद्धी महामार्गाला जोडले जाईल.


या भिंतीचे काम करण्यासाठी चार मोठ्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. हे बंदर २०२९ पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.


येथील समुद्रात २० मीटरहून जास्त नैसर्गिक खोली असल्याने, जगातली मोठी कंटेनर जहाजे इथे सहजपणे ये-जा करू शकतील, जी सुविधा इतर भारतीय बंदरांमध्ये कमी आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त