एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या सामुहिक आत्महत्येत एकूण पाचजणांचा समावेश होता. ज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर चारजणांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये घडली. या घटनेसंबंधी उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करित आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कुटुंब मूळचे नेपाळचे असून पनवेलमधील जावळे गावात अनेक दिवसांपासून राहत होते. मागील दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारच्यांना काहीतरी घडल्याचा संशय आल्याने त्यांनी यासंबंधींची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. सुरक्षा यंत्रणा तात्काळ संबंधीत जागी पाचारण झाली. त्यावेळी घरात सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले.




सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी तातडीने या सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा संतोष बिरा लूहार (वय २२) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बेशुद्ध अवस्थेतील रमेश बिरा लोहार (वय २३), त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन यांच्यावर उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे