एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या सामुहिक आत्महत्येत एकूण पाचजणांचा समावेश होता. ज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर चारजणांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये घडली. या घटनेसंबंधी उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करित आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कुटुंब मूळचे नेपाळचे असून पनवेलमधील जावळे गावात अनेक दिवसांपासून राहत होते. मागील दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारच्यांना काहीतरी घडल्याचा संशय आल्याने त्यांनी यासंबंधींची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. सुरक्षा यंत्रणा तात्काळ संबंधीत जागी पाचारण झाली. त्यावेळी घरात सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले.




सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी तातडीने या सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा संतोष बिरा लूहार (वय २२) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बेशुद्ध अवस्थेतील रमेश बिरा लोहार (वय २३), त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन यांच्यावर उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या

अक्सा बीचवर १३ वर्षांचा मुलगा बुडाला

मुंबई: दिवाळीच्या दिवशीच मुंबईतील मालाड येथील अक्सा बीचवर एक हृदयद्रावक घटना घडली. मयंक ढोलिया (१३) नावाचा मुलगा