१ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग अधिनियम कायद्यात मोठे फेरबदल तुमच्या खात्यावर काय परिणाम होणार जाऊन घ्या....

प्रतिनिधी: १ नोव्हेंबर २०२५ पासून बँकिंग(सुधारणा) कायदा, २०२५ अंतर्गत नवीन नियम लागू होणार आहेत. बँकेच्या नवीन नियमावलीत काही महत्वपूर्ण बदल होतीत त्यातील एक प्रमुख बदल म्हणजे बँक ग्राहक आता ४ नामांकन (Nominee) ठेऊ शकतील. त्यामुळे ग्राहकांच्या मृत्यूपश्चात अथवा अडीअडचणीला ठेवीदारांना त्यांच्या मृत्यूच्या बाबतीत त्यांचे पैसे किंवा मौल्यवान वस्तू कोणाला मिळतील हे ठरवणे सोपे होणार आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी अधिसूचित केलेल्या या कायद्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, बँकिंग नियमन कायदा, स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा आणि बँकिंग कंपन्या कायद्यांसह अनेक बँकिंग कायद्यांमध्ये १९ सुधारणा करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे की नामांकनांशी संबंधित कलम १०, ११, १२ आणि १३ १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होतील. या कलमांमध्ये ठेव खाती, सुरक्षित कस्टडी आयटम आणि लॉकर सामग्री समाविष्ट आहे.


यापूर्वी, दुरुस्ती कायद्यातील काही इतर तरतुदी १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाल्या होत्या. या कायद्याचा उद्देश एकूणच प्रशासन सुधारणे, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांचे संरक्षण करणे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये ऑडिट मजबूत करणे आणि बँकिंग अधिक ग्राहक-अनुकूल बनविणे आहे असे यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे.


महत्वाचा बदल म्हणजे एकाच वेळी किंवा एकामागून एक चार लोकांना नामांकित करू शकता तसेच ठेवीवर तुम्ही एकाच वेळी नामांकने (सर्व नामांकित व्यक्तींना निश्चित शेअर मिळतो) किंवा सलग नामांकने म्हणजे आधीच्या नामांकित व्यक्तीचे निधन झाल्या सच पुढील नामांकन सक्रिय होते या दोन्हीपैकी अथवा दोन्ही तुम्ही पर्याय निवडू शकता. तसेच एकाच वेळी नामांकनांसाठी, तुम्ही नामांकित व्यक्तींमध्ये एकूण हक्क विभागू शकता जेणेकरून एकूण रक्कम १००% पर्यंत रक्कम विभागू शकणार आहात. सुरक्षित ताबा आणि लॉकर सुविधांमध्ये असलेल्या वस्तूंसाठी फक्त सलग नामांकनांना परवानगी आहे. त्यामुळे नव्या नियमानुसार हे अधिक स्पष्ट आणि संरचित उत्तराधिकार सुनिश्चित करणार आहे. तसेच दावेदारांमधील वाद देखिली कमी होईल असे नियामकांचे मत आहे.


बँकिंग कंपन्या (नामांकन) नियम, २०२५ लवकरच प्रकाशित केले जातील ज्यामध्ये नामांकने करण्यासाठी किंवा अद्यतनित करण्यासाठी फॉर्म आणि प्रक्रिया लिखित स्वरूपात स्पष्ट करण्यात येतील. ग्राहकांसाठी हे बदल कौटुंबिक किंवा आर्थिक परिस्थितीनुसार विद्यमान नामांकनांचे पुनरावलोकन (Review) आणि अद्यतनित (Update) करण्याची संधी उपलब्ध करून देतात. ठेवीदार आता अनेक लाभार्थ्यांसाठी योजना आखू शकतात, जेणेकरून त्यांचे निधी, मौल्यवान वस्तू किंवा सुरक्षित ताबा वस्तू कायदेशीर गुंतागुंतीशिवाय त्यांच्या इच्छेनुसार वितरित केल्या जाऊ शकतील असे नव्या नियमनात स्पष्ट केले गेले आहे.

Comments
Add Comment

Mahesh Dixit Appointed IB Chief : महेश दीक्षित यांची आयबी (IB) प्रमुखपदी नियुक्ती; कोण आहेत हे वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी?

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्वात महत्त्वाची अंतर्गत गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau-IB) च्या

FIFA World Cup 2026 Neymar : ९८१ दिवसांनंतर ब्राझीलसाठी मैदानात उतरला नेमार, चाहत्यांचा जल्लोष

इंग्लंड : ब्राझील विरुद्ध स्कॉटलंड (Brazil vs Scotland) सामन्यात तब्बल ९८१ दिवसांनंतर स्टार फुटबॉलपटू नेमार (Neymar) याने

Women's T20 World Cup : शेफाली वर्माची दमदार अर्धशतकी खेळी; भारताने बांगलादेशला ५ गडी राखून हरवलं

इंग्लंड : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने

India vs Ireland T20I : महिला विश्वचषकामुळे भारत-आयर्लंड सामन्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या कसं असेल नवीन वेळापत्रक?

मुंबई : भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) मालिकेपूर्वी मोठा निर्णय

Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India

महाराष्ट्रात उभारले जाणार पर्यावरणपूरक 'ग्रीन डेटा सेंटर'; प्रकल्पांच्या अभ्यासासाठी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती!

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती मुंबई : राज्याचा औद्योगिक विकास वेगाने करतानाच पर्यावरण आणि