तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी तेजस्वी यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे करत, बिहारमध्ये केवळ पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 'डबल इंजिन' सरकारच विकास करु शकते, असे ठामपणे सांगितले.


प्रसाद म्हणाले, "तेजस्वी यादव काय बोलत आहेत, त्यांना तरी कळतेय का? त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये साडेबत्तीस वर्षांची (३२.५) शिक्षा झाली आहे आणि तेजस्वी यादव स्वतः भादंवि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत आरोपी आहेत. बिहारचा विकास कोणी केला आहे, हे येथील जनतेला चांगलेच माहीत आहे."



काँग्रेसकडून तेजस्वी यादव यांची उमेदवारी जाहीर


दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव हेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचे अधिकृत मुख्यमंत्री उमेदवार असतील, असे घोषित केले. गेहलोत म्हणाले, "देशातील परिस्थितीबद्दल सगळ्यांनीच चिंतेत असायला हवे. राहुलजी आणि खर्गेजी यांच्याशी चर्चा करून मी सांगू शकतो की, तेजस्वी यादव हे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ते तरुण आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, जनता त्यांना पाठिंबा देईल."


यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना गेहलोत यांनी बिहारच्या जनतेला बदल हवा असल्याचे सांगितले. केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारची कार्यपद्धती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी टीका करताना म्हटले.


बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील