तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी तेजस्वी यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे करत, बिहारमध्ये केवळ पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे 'डबल इंजिन' सरकारच विकास करु शकते, असे ठामपणे सांगितले.


प्रसाद म्हणाले, "तेजस्वी यादव काय बोलत आहेत, त्यांना तरी कळतेय का? त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये साडेबत्तीस वर्षांची (३२.५) शिक्षा झाली आहे आणि तेजस्वी यादव स्वतः भादंवि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत आरोपी आहेत. बिहारचा विकास कोणी केला आहे, हे येथील जनतेला चांगलेच माहीत आहे."



काँग्रेसकडून तेजस्वी यादव यांची उमेदवारी जाहीर


दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव हेच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी महागठबंधनचे अधिकृत मुख्यमंत्री उमेदवार असतील, असे घोषित केले. गेहलोत म्हणाले, "देशातील परिस्थितीबद्दल सगळ्यांनीच चिंतेत असायला हवे. राहुलजी आणि खर्गेजी यांच्याशी चर्चा करून मी सांगू शकतो की, तेजस्वी यादव हे या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. ते तरुण आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे, जनता त्यांना पाठिंबा देईल."


यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना गेहलोत यांनी बिहारच्या जनतेला बदल हवा असल्याचे सांगितले. केंद्रातील सत्ताधारी एनडीए सरकारची कार्यपद्धती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी टीका करताना म्हटले.


बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि महागठबंधन यांच्यात थेट लढत होणार आहे.

Comments
Add Comment

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

दहशतवाद्यांनी आखला होता ‘बाबरी’चा बदला घेण्याचा कट

६ डिसेंबरला ब्लास्ट करण्यासाठी एक-दोन नव्हे, तब्बल ३२ कारचा होणार होता वापर नवी दिल्ली : दिल्ली कार ब्लास्ट

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर केंद्र सरकारचा इशारा: भारतावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणार

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून,

भारतातील टीबीविरोधी मोहिमेचा मोठा टप्पा: भारतातील टीबी रुग्णांच्या संख्येत २१ टक्क्यांची घट

पंतप्रधान मोदींची आरोग्य क्षेत्राला शाबासकी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी भारतात क्षयरोग

दिल्ली स्फोट प्रकरणी AIU ची अल फलाह विद्यापीठावर कारवाई

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरात आय ट्वेंटी कारमधील स्फोटकांचा स्फोट झाला. या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी तपास पथकाने