कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. त्यात जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी कबुतरखान्याच्या बंदीविरोधात या आधी शस्त्र उचलण्याची भाषा केली होती. मात्र आता आमरण उपोषण करणार असा नारा दिला आहे. तसेच उपोषणाला बसण्याची तारीखसुद्धा जाहीर केली आहे. जैन समूदायाच्या या भूमिकेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे. 'कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान' अशा आशयाचे फलक लावून त्यांनी जैन समूदायाच्या भूमिकेचा निषेध केला आहे.



महापालिकेने कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाजात संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कबुतरखान्यावरून पुन्हा एकदा वाद चिघळण्याची चिन्हं दिसत आहेत. यापूर्वी कबुतरखान्यांच्या बंदीच्या निषेधार्थ जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी शस्त्र उचलण्याचाही इशारा दिला होता. आता मात्र त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर ते आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.


एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचा कबुतरखान्याला विरोध असताना दुसरीकडे जैन समूदाय मात्र कबुतरखाना सुरू करण्यासाठी अडून बसल्याचे चित्र आहे. दादरमधील कबुतरखाना बंद केल्यानंतर अनेक कबुतरांचा मृत्यू झाल्याचे सांगत जैन समूदायाने ११ ऑक्टोबर रोजी कबुतरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. मुंबईतील कबूतरखाने पुन्हा सुरू व्हावेत, अशी मागणी देखील या प्रार्थनासभेतून करण्यात आली.

Comments
Add Comment

Maharashtra Government : महाराष्ट्रात आता ‘ड्रोन’ आणि ‘रोबोटिक्स’ची क्रांती

राज्य सरकारकडून 'स्वयंचलित प्रणाली धोरण-२०२६' जाहीर; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारनिर्मिती

Kalyan Crime : कल्याणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; आरोपी पती अटकेत

कल्याण: शहरात महिलांवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून पतीने

Weather Update : जुलैमध्ये पाऊस येणार ? अरबी समुद्रावरील मान्सूनचे ढग गायब

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेत त्यात आता अरबी समुद्रामुळे मान्सूनचे ढग गायब झाले

Minister Adv. Shelar : कातळशिल्पांच्या वैज्ञानिक संवर्धनाला नवीन गती देण्यासाठी सामंजस्य करार

मुंबई: कोकणातील जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांच्या वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी

Devendra Fadnavis : मुंबई मेट्रोमुळे दुग्धजन्य पदार्थांना मिळणार मोठी बाजारपेठ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्या स्टॉलचे उद्घाटन मुंबई : ग्रामीण भागातील

Ashish Shelar : मुंबईत मीडिया हब उभारणार, डिजिटल कंटेंट क्षेत्राला नवी दिशा मिळणार

मुंबई: भारतातील माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन आणि एआय-निर्मित (AI-generated) चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठेचा १९ वा मुंबई