Guru Purnima : गुरुपौर्णिमा नेमकी कधी ? जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आपल्या गुरुबद्दल असलेला आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. शाळा - कॉलेजांमध्ये गुरुपौर्णिमा हा दिवस अगदी उत्साहाने साजरा केला जातो मात्र या महिन्यात हा दिवस नक्की आहे कधी ? 28 की 29 जुलैला ? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे जाणून घेणार आहोत.(Marathi News)



कधी साजरी करायची गुरुपौर्णिमा ?


हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमेची सुरुवात 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी होत आहे. ही तिथी 29 जुलै रोजी रात्री 8 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणताही सण साजरा करताना उदय तिथीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा 29 जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.(Guru Purnima)



गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. यंदाची गुरुपौर्णिमा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्याही विशेष मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी प्रीती योग आणि हर्षण योगाचा विशेष प्रभाव असल्याचे मानले जाते. प्रीती योगामुळे नात्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद वाढतो, तर हर्षण योग हा यश, आनंद आणि प्रगतीचे प्रतीक मानला जातो.



या गोष्टीचं पालन नक्की करा..


गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन, नामस्मरण, जप, दान आणि साधना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून महर्षी व्यास किंवा भगवान दत्तात्रेय यांचे पूजन करावे. तसेच आपल्या जीवनातील गुरुंचेही पूजन करावे. गुरुंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर ॐ गुरुदत्तात्रेयाय नम: या मंत्राचा जप करणेही शुभ मानले जाते. तसेच गरजूंना अन्नदान करावे.

Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.