स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना 'दिवाळी' भेट, मिळाला एवढा मोठा निधी

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महायुतीच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून प्रत्येकी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आला आहे. आमदारांकडून दलित वस्त्यांमध्ये रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, सामुदायिक सभागृह आणि इतर सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी या निधीचा वापर केला जाईल, असे राज्य शासनाच्यावतीने सांगण्यात आले. मंजूर झालेल्या निधीमुळे समाजातील मागास भागांमध्ये विकासकामांना गती मिळणार आहे.

दिवाळीपूर्वी निधी वितरित झाल्यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर विरोधकांपैकी एकाही आमदाराला सामाजिक विकास योजनेचा निधी मिळालेला नाही. यामुळे विरोधकांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना २०१८-१९ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा (पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये वगैरे) देण्यावर प्राधान्य देण्यात येते. या योजनेत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष काम करण्यासाठी निधी दिला जातो.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (एसईसी) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीआधी निधी मिळाल्यामुळे आमदारांना स्थानिक भागात विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,