Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका भीषण अपघातामुळे सणाला गालबोट लागले. अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पैलपाडा गावाजवळ ही अत्यंत दुःखद घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार जणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी शिरसाट आणि धिरज शिरसाठ या पती-पत्नीचा समावेश आहे, तसेच आरिफ खान यांनाही आपला जीव गमवावा लागला. तर, अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत. सणासुदीच्या दिवशीच तिघांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे आणि मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.



बंद पडलेल्या कारजवळ अपघात: नेमकं काय घडलं?


अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील रहिवासी असलेले धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपे त्यांचे काम आटोपून त्यांच्या चारचाकी गाडीने (Four-wheeler) घरी परतत होते. रस्त्यात अचानक त्यांची कार बंद पडली. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि त्यांची बंद पडलेली कार एका मालवाहू गाडीने (Goods Vehicle) टोचन (Towing) करून नेली जात होती. पैलपाडा गावाजवळ पोहोचल्यानंतर, गाडीतून चौघे जण खाली उतरले. ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीचे टायर्स (Tyres) तपासत होते. नेमक्या याच वेळी, अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यांना चिरडले. धडक इतकी जबर होती की, चौघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. या अपघातात धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट या दांपत्यासह आरिफ खान (सर्व बोरगावमंजूचे रहिवासी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चौथा व्यक्ती अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर अपघाताप्रकरणी बोरगावमंजू पोलिस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर