दिवाळीच्या फोटोमधून पत्नी गायब; वीरेंद्र सेहवागच्या कुटुंबातील तणावाच्या चर्चांना पुन्हा उधाण

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. यंदाच्या दिवाळीच्या सणानिमित्त त्याने आपल्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या, मात्र त्या फोटोत त्याची पत्नी आरती न दिसल्याने अनेकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे.


सेहवागच्या घरी साजऱ्या झालेल्या दिवाळी सेलिब्रेशनचे हे फोटो असून, त्यात तो आपल्या आई आणि दोन मुलांसोबत – आर्यवीर आणि वेदांत – दिसतो. मात्र पत्नी आरती कुठेही नसल्याने, दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना नवे फोड मिळाले आहे.


या फोटोसह सेहवागने एक संस्कृत श्लोक लिहून शुभेच्छा दिल्या –
“दीपज्योतिः परं ब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥”
#HappyDeepavali


हा फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि युजर्सनी कमेंटमध्ये अनेक प्रश्न विचारले. “तुमची पत्नी कुठे आहे?”, “घटस्फोट झाला का?” अशा थेट विचारलेल्या प्रश्नांनी कमेंट सेक्शन भरून गेला. काहींनी तर, “पत्नीशिवाय सण कसा साजरा करता?” असे म्हणत नाराजी व्यक्त केली.


मागील काही महिन्यांपासून सेहवाग आणि आरती यांच्या वैवाहिक नात्याबाबत चर्चा सुरू आहेत. काही अफवांनुसार दोघांमध्ये वाद सुरू असून, आरतीचा सेहवागच्या जवळच्या मित्राशी संबंध असल्याचीही चर्चा झाली होती. मात्र या सगळ्यावर सेहवाग किंवा आरती यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


सेहवाग आणि आरती यांची ओळख कौटुंबिक नात्यातून झाली होती. दोघं लहानपणापासूनच एकमेकांना ओळखत होते. २००४ मध्ये त्यांनी लग्न केलं. हे लग्न नवी दिल्लीतील दिवंगत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानी पार पडलं होतं. त्यांच्या दोन मुलांचा जन्म २००७ आणि २०१० मध्ये झाला.


दिवाळीच्या फोटोत आरतीच्या अनुपस्थितीमुळे, त्यांच्या नात्यात खरोखरच काहीतरी बिनसले आहे का, यावर चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. मात्र, जोपर्यंत या दोघांकडून अधिकृत खुलासा होत नाही, तोपर्यंत याबाबत खात्रीने काहीही म्हणता येणार नाही.

Comments
Add Comment

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या

ग्रँड स्लॅम ४०० व्या विजयाच्या उंबरठ्यावर नोव्हाक जोकोविच!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मेलबर्न : टेनिस जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या नोव्हाक