रेल्वे कर्मचारी प्रवाशांना रांगेत देणार तिकीट

तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा ‘एसटी पॅटर्न’


मुंबई : दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण न मिळाल्याने अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटावर प्रवास करतात. त्यामुळे स्थानकांवरील तिकीट काउंटरवर मोठ्या रांगा लागत असतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने यंदा नवा प्रयोग हाती घेतला आहे. बस कंडक्टरप्रमाणेच रेल्वे बुकिंग कार्यालयातील कर्मचारी आता प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देणार आहेत.


या उपक्रमाअंतर्गत बुकिंग कर्मचारी वेटिंग एरिया किंवा प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या माध्यमातून तिकीट देतील. या मशीनमध्ये रोख रक्कम तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. सध्या ही सुविधा मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल, वाद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांवर सुरू करण्यात आली असून, लवकरच सुरत आणि उधना स्थानकांवरही सुरू होणार आहे. वांद्रे टर्मिनस येथे या कामासाठी नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.


वांद्रे टर्मिनसवरून सर्वाधिक अनारक्षित गाड्या



पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात दिवाळी आणि छठ पर्वाच्या काळात सर्वाधिक अनारक्षित गाड्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून सुटतात. त्यामुळे तेथील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच या काळात ३० आरपीएफ, ३५ जीआरपी आणि १५ होमगार्ड तैनात करण्यात
आले आहेत.



गाडी सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गाड्या सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

वर्गणीविना दीपोत्सवाचा नवा आदर्श!’

आदित्य कांबळे यांचा ‘दिया फॉर युनिटी’ उपक्रम आज खारघरमध्ये उजळणार नवी मुंबई : खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक

मंडला ते चेंबूर हा मेट्रो २ बीचा पहिला टप्पा सुरू होणार

मुंबई  : मुंबईमध्ये लवकरच आणखी एक मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महिन्यातच

गेल्या बावीस महिन्यांत फटाक्यांमुळे १८२ आगी

शिंपोलीत फटाक्याच्या रॉकेटमुळे चार दुकानांना आग मुंबई : मुंबईत यंदा दीपावलीच्या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या

कफ परेडच्या आगीत एकाचा मृत्यू, ३ जण गंभीर ; एकाची प्रकृती चिंताजनक

मुंबई: कफ परेड येथील मच्छीमार नगर परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास एका चाळीत भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना

आज आहे लक्ष्मीपूजन: धन, समृद्धी आणि ऐश्वर्याचे स्वागत!

मुंबई : लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे, जो दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील मुख्य

महायुतीच्या आमदारांना सामाजिक न्याय मंत्र्यांकडून प्रत्येकी २ कोटींचा विकासनिधी वाटप

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रथमच निवडून आलेल्या