रेल्वे कर्मचारी प्रवाशांना रांगेत देणार तिकीट

तिकीट खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा ‘एसटी पॅटर्न’


मुंबई : दिवाळी आणि छट पूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून अनेक प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण न मिळाल्याने अनेक प्रवासी अनारक्षित तिकिटावर प्रवास करतात. त्यामुळे स्थानकांवरील तिकीट काउंटरवर मोठ्या रांगा लागत असतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने यंदा नवा प्रयोग हाती घेतला आहे. बस कंडक्टरप्रमाणेच रेल्वे बुकिंग कार्यालयातील कर्मचारी आता प्रवाशांच्या जवळ जाऊन तिकीट देणार आहेत.


या उपक्रमाअंतर्गत बुकिंग कर्मचारी वेटिंग एरिया किंवा प्रवासी थांबण्याच्या ठिकाणी जाऊन हँडहेल्ड मशीनच्या माध्यमातून तिकीट देतील. या मशीनमध्ये रोख रक्कम तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या पेमेंटची सुविधा उपलब्ध आहे. सध्या ही सुविधा मुंबई सेंट्रल विभागातील मुंबई सेंट्रल, वाद्रे टर्मिनस आणि बोरिवली या स्थानकांवर सुरू करण्यात आली असून, लवकरच सुरत आणि उधना स्थानकांवरही सुरू होणार आहे. वांद्रे टर्मिनस येथे या कामासाठी नऊ बुकिंग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.


वांद्रे टर्मिनसवरून सर्वाधिक अनारक्षित गाड्या



पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात दिवाळी आणि छठ पर्वाच्या काळात सर्वाधिक अनारक्षित गाड्या वांद्रे टर्मिनस स्थानकावरून सुटतात. त्यामुळे तेथील गर्दी नियंत्रणासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे. नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच या काळात ३० आरपीएफ, ३५ जीआरपी आणि १५ होमगार्ड तैनात करण्यात
आले आहेत.



गाडी सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गाड्या सुटण्यापूर्वी सर्व बुकिंग कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी तपासूनच आत सोडले जातात, जेणेकरून गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, असे
अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता