Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा (Flood Situation) मोठा फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, अनेक घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या नुकसानीतून नागरिक आणि विशेषतः शेतकरी जेमतेम सावरत असतानाच, पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत आणि त्रासात भर पडली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे आज, म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आजपासून (२१ ऑक्टोबर) राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार पावसाचे अलर्ट जारी केले आहेत. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



कुठे कुठे आहेत इशारे?




२१ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


२२ ऑक्टोबर, कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.


२३ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.


२४ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.


२५ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर (अहमदनगर). मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (या भागातील सर्व जिल्ह्यांसाठी).


Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी