Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा (Flood Situation) मोठा फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, अनेक घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या नुकसानीतून नागरिक आणि विशेषतः शेतकरी जेमतेम सावरत असतानाच, पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत आणि त्रासात भर पडली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे आज, म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आजपासून (२१ ऑक्टोबर) राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार पावसाचे अलर्ट जारी केले आहेत. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



कुठे कुठे आहेत इशारे?




२१ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


२२ ऑक्टोबर, कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.


२३ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.


२४ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.


२५ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर (अहमदनगर). मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (या भागातील सर्व जिल्ह्यांसाठी).


Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे