Maharashtra Weather Update : यंदाची दिवाळी पावसातचं? राज्यभर पुढील ४ दिवस वादळी पावसाचे थैमान; IMD चा 'हा' इशारा वाचून घ्या.

मुंबई : देशभरातून नैऋत्य मोसमी पावसाने (Southwest Monsoon) माघार घेतल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच, आता महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभे राहिले आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे हवामान खात्याने (IMD) राज्यभरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा (Flood Situation) मोठा फटका बसला होता. या काळात मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली, अनेक घरे पाण्याखाली गेली आणि मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या नुकसानीतून नागरिक आणि विशेषतः शेतकरी जेमतेम सावरत असतानाच, पुन्हा एकदा अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्यांच्या चिंतेत आणि त्रासात भर पडली आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. यामुळे आज, म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आजपासून (२१ ऑक्टोबर) राज्यातील विविध भागांसाठी मुसळधार पावसाचे अलर्ट जारी केले आहेत. प्रामुख्याने कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.



कुठे कुठे आहेत इशारे?




२१ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.


२२ ऑक्टोबर, कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा.


२३ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.


२४ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर (अहमदनगर), सोलापूर. मराठवाडा/विदर्भ: बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली.


२५ ऑक्टोबर, कोकण : रायगड, रत्नागिरी. पश्चिम महाराष्ट्र/मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर (अहमदनगर). मराठवाडा/विदर्भ: संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, धाराशिव, संपूर्ण विदर्भ (या भागातील सर्व जिल्ह्यांसाठी).


Comments
Add Comment

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट

अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर' विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी

Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार

Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा