केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि वीज पडण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. तिरुवनंतपुरम, कोझिकोड, कन्नूर आणि त्रिशूर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान खात्याने 4 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर उर्वरित भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

केरळच्या अनेक भागांमध्ये सोमवारी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले, झाडे उन्मळून पडली आणि वाहतुकीवर परिणाम झाला. दक्षिण तिरुवनंतपुरम तसेच उत्तरेकडील कोझिकोड आणि कन्नूर जिल्ह्यांतील डोंगराळ भागांमध्ये दिवसभर पावसाची संततधार होती आणि आकाशात ढग दाटले होते. सुमारे एक तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे तिरुवनंतपुरम-तेनकासी मार्गावर पाणी साचले, तर पलोडे येथील एलावट्टम रस्त्यावर संध्याकाळी वाहतूक ठप्प झाली.

कन्नूरमध्ये पूराचे पाणी काही घरांमध्ये आणि दुकानदारांच्या आवारात शिरले. या जिल्ह्यात पावसामुळे एका घरावर भिंत कोसळल्याचीही घटना घडली आहे. त्रिशूर जिल्ह्यातील माला आणि एर्नाकुलममधील एलंजी येथे वीज कोसळल्यामुळे घरांचे नुकसान झाले. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या घटनांमध्ये घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी झाली आहेत. त्रिशूरमधील पल्लिपुरम येथे एका घरावर झाड कोसळले, मात्र सुदैवाने संपूर्ण कुटुंब बचावले.

दरम्यान, भारत हवामान विज्ञान विभागाने एर्नाकुलम, इडुक्की, मलप्पुरम आणि कोझिकोड या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत भूस्खलन, दरड कोसळणे आणि अचानक पूर येण्याची शक्यता असलेल्या भागांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)