मेट्रोच्या वेगवेगळ्या लाईनवर वेगवेगळे नियम; दिव्यांग प्रवाशांमध्ये भेदभाव

दीपक कैतके यांची सरकारकडे तत्काळ कारवाईची मागणी


मुंबई  : मुंबईतील मेट्रो प्रवासात दिव्यांग प्रवाशांवर होणाऱ्या भेदभावाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. मेट्रोच्या लाइन २ए आणि लाइन ७ वर दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सवलत दिली जाते, मात्र अत्यंत जवळच्या लाइन ३ (अक्वा लाईन) वर हीच सवलत अद्याप लागू झालेली नाही. या असमान धोरणामुळे दिव्यांग प्रवाशांना दररोज आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य व दिव्यांग प्रतिनिधी दिपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून तातडीने या भेदभावावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. “एका मार्गावर सवलत मिळते आणि दुसऱ्यावर नाही, हा स्पष्ट भेदभाव आहे. हा दिव्यांगांच्या अधिकारांवरील थेट आघात आहे,” असे कैतके यांनी स्पष्ट केले. या भेदभावामागे मेट्रो ऑपरेटरांचे वेगळे धोरण, स्मार्ट कार्ड प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि शासनातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास आले आहे. सामाजिक संघटना व हक्क रक्षण करणाऱ्या संस्थांनीही या प्रकरणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांचा ठाम आग्रह आहे की दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सवलत देणे ही ‘सुविधा नसून कायद्याने दिलेला हक्क’ आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी