बिर्याणी पडली महागात! ग्राहकाने केली हॉटेल मालकाची हत्या, वाचा सविस्तर

झारखंड: रांचीमध्ये एक अशी घटना घडली आहे, जी कळताच तुम्हाला धक्का बसेल. शाकाहारी बिर्याणी ऐवजी मांसाहारी बिर्याणी दिल्यामुळे झालेल्या वादातून ग्राहकाने हॉटेल मालकाची हत्या केली आहे. शुल्लक कारणामुळे एखाद्या व्यक्तीची हत्या करणे किती सर्वसामान्य झाले आहे, हे घटनेतून ठळक झाले आहे. ही घटना रांचीमधील कांके पिथोरिया रोडवरील शेफ चौपाटी या हॉटेलमध्ये घडली आहे.


शेफ चौपाटी या रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने शाकाहारी बिर्याणी मागवली होती. मात्र त्याला मांसाहारी बिर्याणी देण्यात आली. यामुळे हॉटेलमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे प्रमाण एवढे वाढले कि, ग्राहकाने शेफ चौपाटी हॉटेलचे मालक विजय कुमार यांची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर आरोपी घटना स्थळावरून पळून गेला असून पोलीसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.


हॉटेल मालकावर गोळीबार झाल्यानंतर आसपासच्या लोकांनी हॉटेल मालक विजय यांना रांची येथील रिम्स रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून पोलीसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रांचीचे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रवीण पुष्कर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या हत्येमागे फक्त बिर्याणीचे कारण होते की दुसरे काही कारण होते याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी रांचीमधील काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही बारकाईने तपासणी करत आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार

रेड फोर्ट स्फोटानंतर 'शाह' ॲक्शन मोडमध्ये! गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक

नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी रेड फोर्टजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर,

New DSP NFO Launch: डीएसपी म्युच्युअल फंडाकडून ईटीएफसह इतर फंडातील एक्सपोजरसाठी Passive रेंजमध्ये वाढ !

जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निर्देशांकाद्वारे गुंतवणूकदारांना भारतातील लार्ज आणि मिडकॅप संधींमध्ये

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

एआय ही समस्या नाही तर हवामान आव्हानाचा उपाय आहे: केपीएमजी इंटरनॅशनल रिपोर्ट

९६ टक्के कार्यकारी अधिकारी मानतात की स्वच्छ ऊर्जा एआयच्या मागण्या पूर्ण करू शकते, जरी १३ टक्के लोक स्वच्छ ऊर्जा

इस्लामाबादमध्ये स्फोट! अपघात की घातपात?

इस्लामाबाद: इस्लामाबाद न्यायालयाबाहेर आज दुपारी १२:३० च्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. ज्यात सहा जणांचा मृत्यू