सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील जनरेटरला लागलेली आग ताजी असतानाच, रविवारी पहाटे कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा वसाहतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागून शिरोडिया कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

या आगीत रेखा शिसोडिया (आई) आणि पायल शिसोडिया (मुलगी) हे दोघे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात तीन गॅस सिलिंडर असल्याने आगीचा भडका उडाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसरी घटना वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये घडली. रात्री दीडच्या सुमारास १९व्या मजल्यावर आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सलग लागलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषत: उंच इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टीम कार्यरत आहे का, गृहसंस्थांनी सेफ्टी ऑडिट केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता महापालिका प्रशासन यावर कारवाई करते की बघ्याची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य