सलग आगीच्या घटनांनी खळबळ! नवी मुंबई व पनवेलकर चिंतेत

रायगड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व पनवेल परिसरात सलग लागलेल्या दोन आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच पनवेल महानगरपालिका मुख्यालयातील जनरेटरला लागलेली आग ताजी असतानाच, रविवारी पहाटे कामोठे सेक्टर ३६ मधील अंबे श्रद्धा वसाहतीतील तिसऱ्या मजल्यावर आग लागून शिरोडिया कुटुंबातील दोन सदस्यांचा मृत्यू झाला आहे.

या आगीत रेखा शिसोडिया (आई) आणि पायल शिसोडिया (मुलगी) हे दोघे दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. प्राथमिक माहितीनुसार, स्वयंपाकघरातील इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. घरात तीन गॅस सिलिंडर असल्याने आगीचा भडका उडाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच कळंबोली, पनवेल आणि न्यू पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. दलाच्या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, दुसरी घटना वाशी सेक्टर १४ येथील एम.जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडेन्सीच्या बी विंगमध्ये घडली. रात्री दीडच्या सुमारास १९व्या मजल्यावर आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या सलग लागलेल्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांत महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विशेषत: उंच इमारतींमधील फायर सेफ्टी सिस्टीम कार्यरत आहे का, गृहसंस्थांनी सेफ्टी ऑडिट केले आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता महापालिका प्रशासन यावर कारवाई करते की बघ्याची भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "