बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर आयसीसीच्या बैठकीत हा विषय मांडला जाईल, असा इशारा बीसीसीआयने एसीसी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे. बीसीसीआयने एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे इशारा दिला आहे की, जर भारताला विजेतेपदाची ट्रॉफी दिली गेली नाही, तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.


बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माध्यमांना सांगितले की, जर नक्वी यांनी या प्रकरणावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर बीसीसीआय टप्प्याटप्प्याने कारवाईची तीव्रता वाढवेल.


आशिया चषक २०२५ मध्ये २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून स्पर्धा जिंकली. मात्र, विजयानंतर ट्रॉफी सादरीकरणात अनपेक्षित घडामोडी घडल्या. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे नक्वी ट्रॉफी घेऊन मंचावरून निघून गेले आणि ट्रॉफी भारताकडे सोपवली गेलीच नाही.


या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन वेळा सामना झाला आणि तिन्ही वेळा भारताने विजय मिळवला. भारताने १४ सप्टेंबर रोजी गट टप्प्यात पहिला विजय मिळवला, ज्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकड्यांशी हस्तांदोलन करण्यास टाळाटाळ केली होती.


दुसरा सामना २१ नोव्हेंबर रोजी सुपर फोर टप्प्यात झाला, ज्यात पुन्हा भारताने बाजी मारली. अंतिम सामन्यातही भारताने विजय मिळवत पाकिस्तानवर वर्चस्व सिद्ध केले. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आले. आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वाधिक वेळा (९ वेळा) विजेतेपद पटकावणारा संघ आहे.

Comments
Add Comment

दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

अहमदाबाद : वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ अंतर्गत सुपर ८ फेरीचा

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही