चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद


नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल 'सर्वम एआय'चे लवकरच आगमन होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, हा भारतीय 'एआय' मॉडेल डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत तयार होईल. त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की ते स्वतः 'सर्वम एआय'चा वापर सुरू करणार आहेत.


काय आहे 'सर्वम एआय'?


बेंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी 'सर्वम एआय' प्रगत 'एआय' संशोधनाला वास्तविक जीवनात वापरण्यायोग्य बनवण्यासाठी काम करत आहे. 'सर्वम एआय'ने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये एक सॉफ्टवेअर सादर केले होते, जे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी केवळ मजकूर (टेक्स)ऐवजी बोलून (व्हॉइस) संवाद साधण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानाला भारताच्या १० स्थानिक भाषांमधील डेटावर प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यामुळे हे अनेक भारतीय भाषांना सपोर्ट करते. त्यामुळे वापरकर्ते आपापल्या भाषेत बोलून संवाद साधू शकतील. सध्या बाजारात असलेल्या चॅटजीपीटी आणि जेमिनी सारख्या 'एआय' चॅटबॉट्सपेक्षा 'सर्वम एआय' स्थानिक भाषांमध्ये वापरता येत असल्याने अधिक उपयुक्त ठरू शकते.


सर्वम एआयची महत्त्वाची वैशिष्ट्ये


१० भारतीय भाषांमध्ये करणार सपोर्ट : सुरुवातीला 'सर्वम एआय' हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मराठी, गुजराती, कन्नड, ओडिया, पंजाबी आणि मल्याळम यासह १० भाषांमध्ये व्हॉइस इंटरेक्शन आणि फ्रॉड डिटेक्शनची सुविधा देईल.
आधार सेवांमध्ये वापर : एप्रिलमध्ये, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने (यूआयडीएआय) आधार सेवा अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि जलद करण्यासाठी 'सर्वम एआय'सोबत भागीदारी केली आहे.



सुरक्षितता : हा 'एआय' सिस्टम आधार धारकांकडून त्यांच्या नोंदणी आणि अपडेटच्या प्रक्रियेबद्दल रिअल-टाइम फीडबॅक घेईल आणि कोण जास्त पैसे घेत नाही याची पडताळणी करेल. तसेच, प्रमाणीकरणा दरम्यान कोणतीही संशयास्पद कृती आढळल्यास, 'एआय' प्रणाली त्वरित फसवणूक अलर्ट देईल.



ऑटोमेशन : 'सर्वम एआय'ला रिअल-टाइममध्ये बोलून संवाद साधण्यासाठी आणि काही कामे आपोआप करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. 'सर्वम एआय' हे भारताला 'जनरेटिव्ह एआय'च्या पुढील मोठ्या टप्प्यासाठी एक महत्त्वपूर्ण टेस्टिंग ग्राउंड बनवते. लवकरच येणारा हा स्वदेशी 'एआय' भारताची आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील पकड मजबूत करेल.

Comments
Add Comment

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार

प्रभू श्रीरामांच्या नगरीत इतिहासाची पुनरावृत्ती! अयोध्या दीपोत्सवात दोन नवीन 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

अयोध्या, उत्तर प्रदेश : प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या पुन्हा एकदा आपल्या 'भव्य आणि दिव्य दीपोत्सवा'मुळे जागतिक

केरळच्या ६ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, तामिळनाडूमध्येही मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः हवामान विभागाने