दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील जवान देशाचे रक्षण करत असतो. त्यांची दिवाळी म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणे हेच होय. त्यामुळे भारतीय जवानांनासुद्धा सीमेचे रक्षण करताना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी फराळ पाठवण्यात आला आहे.


भारत विकास परिषदेने यावर्षी पनवेलमधून ६० हजार लाडू, ६० हजार चकल्या, १ हजार ८७५ किलो शेव, चिवडा आणि शंकरपाळे असा एकूण १३ हजार ५० किलोचा फराळ भारतीय जवानांना पाठवला आहे. भारत विकास परिषदेच्या या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग असतो. ज्यामुळे एवढा फरळ तयार करणे शक्य होते. यावर्षी या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.​​लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर आणि जैसलमेर प्रदेशातील सीमाभागात फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे.




यंदाही दिवाळीपूर्वीच पनवेलकरांचा फराळ भारताच्या सीमेवर पोहचविण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून केला आहे. सैनिकांना दिवाळीत फराळ मिळावा, हा उद्देश ठेवून जुलैपासून तयारी सुरू करण्यात आली होती. हा फराळ प्रत्येक सैनिकासाठी स्वतंत्र बॉक्स मध्ये पॅक करण्यात आला. ज्यात एका बॉक्समध्ये ४ लाडू, चकली, शेव, शंकरपाळी, चिवडा असा ९०० ग्रॅम वजनाचा फरळा भरण्यात आला आहे. असे पंधरा हजार बॉक्स तयार करण्यात आले.


लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी यावर्षी तब्बल ४० लाखांचा खर्च झाला. अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला. तसेच प्रत्यक्ष आर्थिक मदत करू न शकणाऱ्या व्यक्तींनी फराळाचे बॉक्स पॅकिंग करून श्रमदान केले. फराळाच्या बॉक्ससोबतच शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेली शुभेच्छापत्रेही पाठवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.

Bigg Boss Marathi Ticket To Finale: अखेर 'ही' सदस्य ठरली पहिली फायनलिस्ट, 'तिकीट टू फिनाले'च्या टास्कमध्ये मारली बाजी

मुंबई : बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi ) सीझन ६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून अनेक टास्क आणि आव्हानं पार करुन घरातील ७

Manipur Violence : मणिपूरमध्ये आंदोलनं चिघळलं, बॉम्बहल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूर येथे पुन्हा एकदा आंदोलन झालं आहे. सोमवारी मध्यरात्री विष्णुपूर जिल्ह्यात एका घरावर झालेल्या

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत