दिवाळीनिमित्त सैनिकांना सीमेवर फराळ, पनवेलकरांचा उत्तम उपक्रम!

पनवेल: दिवाळी सणाला अनेक भारतीय घरांमध्ये फराळ केला जातो. उत्साहाचे वातावरण असते. मात्र सणाच्या वेळी सीमेवरील जवान देशाचे रक्षण करत असतो. त्यांची दिवाळी म्हणजे आपल्या सीमेचे रक्षण करणे हेच होय. त्यामुळे भारतीय जवानांनासुद्धा सीमेचे रक्षण करताना दिवाळी सणाचा आनंद घेता यावा यासाठी भारत विकास परिषदेच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी फराळ पाठवण्यात आला आहे.


भारत विकास परिषदेने यावर्षी पनवेलमधून ६० हजार लाडू, ६० हजार चकल्या, १ हजार ८७५ किलो शेव, चिवडा आणि शंकरपाळे असा एकूण १३ हजार ५० किलोचा फराळ भारतीय जवानांना पाठवला आहे. भारत विकास परिषदेच्या या उपक्रमात अनेक नागरिकांचा सहभाग असतो. ज्यामुळे एवढा फरळ तयार करणे शक्य होते. यावर्षी या उपक्रमाचे सहावे वर्ष आहे.​​लेह, सियाचीन, तवांग, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, पुंछ, राजस्थान, बारमेर आणि जैसलमेर प्रदेशातील सीमाभागात फराळ पोहचेल याची व्यवस्था केली गेली आहे.




यंदाही दिवाळीपूर्वीच पनवेलकरांचा फराळ भारताच्या सीमेवर पोहचविण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून केला आहे. सैनिकांना दिवाळीत फराळ मिळावा, हा उद्देश ठेवून जुलैपासून तयारी सुरू करण्यात आली होती. हा फराळ प्रत्येक सैनिकासाठी स्वतंत्र बॉक्स मध्ये पॅक करण्यात आला. ज्यात एका बॉक्समध्ये ४ लाडू, चकली, शेव, शंकरपाळी, चिवडा असा ९०० ग्रॅम वजनाचा फरळा भरण्यात आला आहे. असे पंधरा हजार बॉक्स तयार करण्यात आले.


लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी यावर्षी तब्बल ४० लाखांचा खर्च झाला. अनेक तरुणांनी या उपक्रमात भाग घेतला. तसेच प्रत्यक्ष आर्थिक मदत करू न शकणाऱ्या व्यक्तींनी फराळाचे बॉक्स पॅकिंग करून श्रमदान केले. फराळाच्या बॉक्ससोबतच शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेली शुभेच्छापत्रेही पाठवण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी