दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुणेकरांची वाहनखरेदी धडाक्यात, गतवर्षी पेक्षा यंदा १,१५२ वाहनांची वाढ

पुणे : पुणेकरांनी यंदाच्या दिवाळीत वाहन खरेदीसाठी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मी पूजन आणि पाडवा या दिवाळीतील शुभमुहूर्तांदरम्यान एकूण १३ हजार ३८७ वाहनांची नोंदणी झाली. यात ८ हजार ७६३ दुचाकी आणि २ हजार ७६८ चार चाकींचा समावेश आहे. व अन्य इतर वाहने, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहनखरेदीत किंचित वाढ झाली आहे.


प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ पुणे येथे ८ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ही नोंद झाली. गेल्या वर्षी (दि. १९ ते २८ ऑक्टोबर ) एकूण १२ हजार २३५ वाहनांची खरेदी झाली होती. त्यामुळे यंदा पुण्यातली वाहन खरेदी ही १ हजार १५२ वर गेली आहे. नवीन वाहन खरेदीचा आनंद घेताना पुणेकरांनी आपली नवी वाहने सजवून त्यांची मुहूर्तावर विधिवत पूजा करून घरी नेली यामुळे वाहनांच्या शोरूम बाहेर पुणेकरांची गर्दी पाहायला मिळाली. शोरूम बाहेर लगबग आणि फोटोंसाठी उभे असलेले ग्राहक असे चित्र काल पुण्यातील बऱ्याच शो रूम बाहेर बघायला मिळाले. शुभ मुहूर्तावर पुणेकरांन वाहन घरी घेऊन जात यावे म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यांकडून मेहनत घेतली गेली. वाहनविक्रेत्यांकडून आलेल्या नोंदणी अर्जाचे तत्परतेने परीक्षण करून नोंदी वेळेत पूर्ण करण्यात येत असल्याचे आरटीओ कडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती