मच्छीमारांसाठी दिवाळी हंगाम सुगीचा

मुरुड-जंजिरा:पर्यटकांना ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीसह दिवाळीच्या सुटीत वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यासाठी मुरुड परिसरातील कोळीबांधव तयारीला लागले. मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. सोडे खरेदीची २५ लाखांची उलाढाल होते.


सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील, अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रेमाने सुकवली व दिवाळीसाठी साठवली. पर्यटकांची चांगली साथ मिळाली तर कोळी आर्थिंक सक्षम होतो. कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे की मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रीटचे ग्राउंड पाहिजे. जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. वर्षाला हजारो कोटींची उलाढाल होते. येथील मच्छीमारांचे मासेमारीत कौशल्य बघता यथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणाऱ्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल.

Comments
Add Comment

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार

नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

नगराध्यक्ष-नगरसेवक पदांसाठी ६२९ उमेदवार रिंगणात, उद्या संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपणार अडीच लाख मतदार ठरविणार