विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघातून यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. तरुण नेतृत्व, स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क आणि कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा यामुळे या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


प्रचाराचा नारळ फोडताच मतदारसंघात शिवसेनेचे वातावरण अधिकच बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध गावांमध्ये सभा, भेटीगाठी आणि संवाद यात्रांच्या माध्यमातून विकास गोगावले थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत गोगावले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप युतीकडून नीलेश महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.


मात्र वाढता जनसंपर्क, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि होत असलेले पक्ष प्रवेश यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार विकास गोगावले यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आधारित निवडणूक लढवत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच नव्या दमाच्या नेतृत्वामुळे नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच उत्सुकतेची ठरत असून, या लढतीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या