विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात

रायगड : राज्यातील राजकारणात लक्षवेधी ठरणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघातून यंदा रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि युवा सेनेचे सचिव विकास गोगावले यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरून आपल्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. तरुण नेतृत्व, स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क आणि कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा यामुळे या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


प्रचाराचा नारळ फोडताच मतदारसंघात शिवसेनेचे वातावरण अधिकच बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. विविध गावांमध्ये सभा, भेटीगाठी आणि संवाद यात्रांच्या माध्यमातून विकास गोगावले थेट मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत गोगावले यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला आहे. या घडामोडींमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप युतीकडून नीलेश महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यामुळे ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.


मात्र वाढता जनसंपर्क, तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि होत असलेले पक्ष प्रवेश यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास उमेदवार विकास गोगावले यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावर आधारित निवडणूक लढवत मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच नव्या दमाच्या नेतृत्वामुळे नाडगावतर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक अधिकच उत्सुकतेची ठरत असून, या लढतीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित