भाईजानच्या सुरक्षेत वाढ, शूटींग दरम्यान फोन जवळ ठेवणेही बंधनकारक

मुंबई: सलमान खान नेहमीच त्याला येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत असतो. सलमानला सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या आजूबाजूला कडक सुरक्षा असते. सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट 'बॅटल ऑफ गलवान' च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. हे शूटींग एवढ्या कडक बंदोबस्तमध्ये सुरू आहे की, सलमानच्या आजूबाजूला पक्षी फिरणे सुद्धा कठीण असल्याचे सूत्रांकडून कळते. बिग बॉसच्या सेवटवर जेव्हा सलमान येतो त्यावेळीही मोठा बंदोबस्त असतो.


वर्षानुवर्षे सलमान खानची सुरक्षा त्याचा अंगरक्षक शेरा सांभाळत आहे. जो सावलीसारखा त्याच्यासोबत राहतो. आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर असो किंवा भारतातील शूटिंग दरम्यान, शेरा नेहमीच सलमान खानसोबत असतो. पण मिळालेल्या माहितीनुसार समजते की, शेरा व्यतिरिक्त १५ प्रशिक्षित कमांडो सलमानच्या सुरक्षेचा भाग आहेत. याशिवाय, सलमानला सरकारनेही सुरक्षा पुरवली आहे. त्याला भारतातील इतर कोणत्याही अभिनेत्यापेक्षा जास्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे.



सलमान खान सध्या मुंबईत 'बॅटल ऑफ गलवान' चे शूटिंग करत आहे. शूटींग दरम्यान चित्रपटाच्या सर्व कलाकारांना आणि क्रूला त्यांचे मोबाईल फोन शूटिंगच्या ठिकाणापासून दूर ठेवणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सलमान खान, तसेच दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांचा समावेश आहे. कारण शूटिंगच्या ठिकाणावरील कोणत्याही फोनवरून सलमानला ट्रॅक करता येऊ शकते. त्यामुळे सुरक्षेचा पर्याय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शूटिंगनंतर कोणत्याही सदस्याच्या फोनवर काही संशयास्पद आढळल्यास त्याची चौकशी केली जाते. शिवाय, जर कोणी सेटवर सलमानला भेटायला आला तर त्यांना प्रथम त्यांचे आधार कार्ड स्कॅन करून परवानगी घेणे सक्तीचे केले आहे.

Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय