मुंबई विमानतळावर १.६ कोटींच्या सोन्याची तस्करी, दोघांना अटक

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत दोन सफाई कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या कर्मचाऱ्यांवर १.६ कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे.


गुप्त माहितीनंतर डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटने विमानतळावर तैनात असलेल्या काही कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. याच दरम्यान एका सफाई कर्मचाऱ्याच्या संशयास्पद हालचाली अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या. विमानाची साफसफाई झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने एरोब्रिजच्या जिन्यावर धाव घेतली आणि एका कोपऱ्यात एक पॅकेट लपवण्याचा प्रयत्न केला. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत ते पॅकेट जप्त केले. त्यामध्ये पांढऱ्या कापडात गुंडाळलेली आणि मेणाच्या रूपात लपवलेली १.२ किलो सोन्याची धूळ आढळली. या सोन्याची किंमत सुमारे १.६ कोटी रुपये आहे.


तपासात उघडकीस आले की, हा कर्मचारी विमानतळावरील सफाई कर्मचाऱ्यांच्या टीम लीडरपदी कार्यरत आहे. त्याने तपासाधिकाऱ्यांना कबूल केले की, ओळख पटू नये म्हणून त्याने हे पॅकेट लपवले होते. पर्यवेक्षकाने सोनं विमानातून बाहेर काढून लपवण्यासाठीच दिले होते, अशी कबुली कर्मचाऱ्याने दिली. ही कबुली मिळताच डीआरआयने त्वरित पर्यवेक्षकालाही ताब्यात घेतले. दोघांनाही सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, हा प्रकार एका आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेटचा भाग असून त्यामध्ये परदेशी प्रवाशांचाही सहभाग आहे. प्रवासी विमानातच सोने लपवून ठेवत आणि विमानतळावरील कर्मचारी ते ताब्यात घेऊन गुप्तपणे बाहेर काढत होते.


डीआरआयच्या म्हणण्यानुसार, ही घटना विमानतळांवरील अंतर्गत प्रवेश आणि कर्मचाऱ्यांच्या सहभागाच्या माध्यमातून कशी मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते याचे उदाहरण आहे. अशा प्रकारामुळे केवळ महसुलाचे नुकसान होत नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होतो. सध्या या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींचा शोध सुरू असून, या तस्करी सिंडिकेटमागील परदेशी कनेक्शनचा तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल