पुन्हा एकदा मोदी आणि अमित शाहंचा झंझावात दिसणार


पाटणा : विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रचारसभांचा झंझावात दिसणार आहे. पंतप्रधान मोदींच्या बिहारमध्ये १२ प्रचासभा होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये २५ प्रचारसभा घेणार आहेत.


पंतप्रधान मोदी २३ ऑक्टोबर रोजी सासाराम, गया, भागलपूर यानंतर २८ ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर, पाटणा नंतर १ नोव्हेंबर रोजी छपरा, पूर्व चंपारण, समस्तीपूर आणि ३ नोव्हेंबर रोजी पश्चिम चंपारण, सहरसा, अररिया येथे प्रचारसभा घेणार आहेत. मोदींच्या १२ प्रचारसभांचा कार्यक्रम भाजपने जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बिहारमध्ये २५ प्रचारसभा घेणार आहेत.


बिहारमध्ये एनडीएने (रालोआ) निवडणुकीसाठी समन्वय राखला आहे. पण विरोधकांना समन्वय राखणे जमलेले नाही. अनेक जागांवर विरोधकांनी एकमेकांविरुद्ध उमेदवार दिल्याचे चित्र आहे. विरोधकांमधील समन्वयाचा अभाव उघड झाला आहे.


यावेळी बिहारमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान घेतले जाईल. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.


निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये एकूण ७ कोटी ४३ लाख मतदार आहेत. यामध्ये ३ कोटी ९२ लाख पुरुष आणि ३ कोटी ५० लाख महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यंदा सुमारे १४ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १,२०० मतदार असतील. मतदानाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना त्यांची नावे नोंदवता येणार आहेत, तर एसआयआरच्या माध्यमातून अंतिम यादी ३० सप्टेंबर रोजीच जाहीर करण्यात आली आहे.


निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे ज्ञानेश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर, निवडणुकीच्या काळात प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर (बनावट बातम्यांवर) कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. सर्व मतदान केंद्रांवर हिंसाचारावर शून्य सहनशीलतेचे (Zero Tolerance) निर्देश देण्यात आले असून, सर्व अधिकारी निष्पक्षपणे काम करतील. वृद्ध मतदारांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध असतील. तसेच, सर्व मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रिया थेट प्रक्षेपित केली जाईल, अशी महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगाने दिली.


एका बाजूला सत्तेत राहण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत असताना, दुसरीकडे ७.४२ कोटी मतदारांना शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात आपला कौल देता यावा, यासाठी निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात होणारे हे मतदान आणि त्यानंतर १४ तारखेला लागणारा निकाल बिहारच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवणार आहे.




  1. बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार

  2. विधानसभेच्या २४३ जागांसाठी मतदान होणार

  3. मतदान ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार

  4. मतमोजणी आणि निकाल १४ नोव्हेंबरला जाहीर होणार

  5. बिहारमध्ये एकूण मतदार ७४.३ दशलक्ष

  6. बिहार : ३९.२ दशलक्ष पुरुष आणि ३५ दशलक्ष महिला मतदार तर १७२५ तृतीयपंथी मतदार

  7. बिहारमध्ये १८ ते १९ वयोगटातील १४.०१ लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार


Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार