बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचीच जादू !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास


बेगुसराय  : बिहारमधील जनता एनडीए सोबत आहे. पंतप्रधान मोदी यांचे बिहारवर आणि बिहारमधील लोकांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर खूप प्रेम आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची जादू संपूर्ण बिहारवर आहे. बिहारमधील एनडीएत सहभागी असलेले सर्व पक्ष आणि त्यांचे नेते एक चांगला विजय येथे साकारतील, असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी काही ठिकाणाच्या प्रचारसभेत सहभाग घेतला. बिहारमधील विरोधकांवर टीका करताना, फडणवीस म्हणाले की, हे महाठकबंधन आहे. जनतेलाही लुटत आहेत आणि आपल्या मित्रपक्षांनाही फसवत आहेत. वरवर कितीही दाखवत असले, तरी विरोधक आतून एकत्र नाहीत. कारण हे सगळे जण सत्तेच्या लालसेचे धनी आहेत. त्यांना बिहार आणि येथील जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ सत्तेशी मतलब आहे. हे कधीही एकत्र येणार नाही आणि एकत्र लढणार नाहीत. यांचा दारुण पराभव होणार आहे. बेगूसराय येथेही जाऊन आलो आणि तिथे प्रत्येक ठिकाणी केवळ एनडीएचीच चर्चा आहे,
असे ते म्हणाले.


बेगुसराय असो किंवा संपूर्ण बिहार असो, येथे एनडीएची जोरदार लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार पुन्हा एकदा एनडीएसोबत आहे. बिहारचे प्रेम पंतप्रधान मोदींवर काकणभर अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेगुसराय विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंदन कुमार यांच्या प्रचारासाठी बिहारमधील बेगुसराय येथे भाजपचा रोड शो झाला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटना साहिब विधानसभा भाजपचे उमेदवार रत्नेश कुशवाहा यांच्या प्रचारार्थ 'नामांकन व आशीर्वाद सभा' यामध्ये सहभाग नोंदवला. बिहार दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी पटना विमानतळावर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची भेट घेतली.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना