गुजरातच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

गांधीनगर  : गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार करण्यात आला. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा विस्तार महत्त्वाचा मानला जात आहे. तत्पूर्वी, गुरुवारी मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे, या मंत्रिमंडळ विस्तारात हर्ष संघवी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी २५ आमदारांना पदाची शपथ दिली, ज्यामुळे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या २६ झाली आहे. गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेले आमदार अर्जुन मोढवाडिया यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल, प्रफुल्ल पानशेरिया, कुंवरजी बावलिया यांना पुन्हा मंत्रीपद देण्यात आले आहे. कनुभाई देसाई, पुरुषोत्तम सोळंकी, नरेश पटेल, अहमदाबादच्या माजी उपमहापौर दर्शना वाघेला, गुजरात भाजप एससी मोर्चाचे माजी प्रमुख प्रद्युम्न वाजा, मोरबीचे कांतीलाल अमृतिया आणि वडोदराच्या मनीषा वकील यांनाही मंत्रीपदे बहाल केली आली आहेत.


मिसेस रवींद्र जडेजा मंत्रिमंडळात : क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी रिवाबा जडेजा राजपूत संघटना करणी सेनेच्या सदस्या होत्या. २०१८ मध्ये करणी सेनेने संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ या चित्रपटात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत मोठे आंदोलन केले होते, तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्याच वर्षी त्यांना करणी सेनेच्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका