मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या मते, यामुळे मुंबईच्या जलवाहतुकीत नवी क्रांती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित बोटींची सविस्तर पाहणी केली.



मुंबईच्या जल वाहतुकीत नवी क्रांती:


मंत्री राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. कॅन्डेलाच्या पर्यावरणपूरक बोटींमुळे नागरिकांना जलवाहतुकीचा नवीन अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. याशिवाय, या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.



बोट नेमकी कशी आहे?


बोटींच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना, मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या बोटांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात. त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी मंत्री नितेश राणे यांना कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना, उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यात महाराष्ट्रात उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक माहिती दिली.


या उपक्रमामुळे मुंबईत जलवाहतुकीला गती मिळेल, किनारपट्टीच्या क्षेत्रात विकास होईल आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी उपलब्ध होईल. जलवाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या स्मार्ट सिटी दृष्टीकोनाला नवीन दिशा मिळेल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आता पोस्ट ऑफिसमध्येही रेल्वे तिकीट मिळणार

मुंबई: दिवाळी आणि छठ पूजा यासारख्या सणांमध्ये रेल्वे तिकिटे मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली

दिवाळीच्या तोंडावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, नागरिकांचा प्रवास होणार उशिराने

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार, १९ ऑक्टोबर रोजी