मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या मते, यामुळे मुंबईच्या जलवाहतुकीत नवी क्रांती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित बोटींची सविस्तर पाहणी केली.



मुंबईच्या जल वाहतुकीत नवी क्रांती:


मंत्री राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. कॅन्डेलाच्या पर्यावरणपूरक बोटींमुळे नागरिकांना जलवाहतुकीचा नवीन अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. याशिवाय, या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.



बोट नेमकी कशी आहे?


बोटींच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना, मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या बोटांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात. त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी मंत्री नितेश राणे यांना कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना, उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यात महाराष्ट्रात उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक माहिती दिली.


या उपक्रमामुळे मुंबईत जलवाहतुकीला गती मिळेल, किनारपट्टीच्या क्षेत्रात विकास होईल आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी उपलब्ध होईल. जलवाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या स्मार्ट सिटी दृष्टीकोनाला नवीन दिशा मिळेल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील

माहिम मोरी रोड शाळेच्या पुनर्विकासाच्या भूमिपुजनाचा लवकरच वाढणार नारळ

तब्बल सात वर्षांपासून बंद करण्यात आली शाळा, दोन वर्षांपासून आहे जमिनदोस्त मुंबई (विशेष प्रतिनिधी): माहिममधील