मुंबईत जलवाहतुकीत नवी क्रांती! ना लाटांचे धक्के, ना आवाज मुंबईत येतेय भविष्याची ‘कॅन्डेला’ बोट

कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानाने युक्त बोटी लवकरच मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात दाखल होणार आहेत. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या मते, यामुळे मुंबईच्या जलवाहतुकीत नवी क्रांती होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित बोटींची सविस्तर पाहणी केली.



मुंबईच्या जल वाहतुकीत नवी क्रांती:


मंत्री राणे म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. कॅन्डेलाच्या पर्यावरणपूरक बोटींमुळे नागरिकांना जलवाहतुकीचा नवीन अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. याशिवाय, या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल आणि नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.



बोट नेमकी कशी आहे?


बोटींच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलताना, मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या बोटांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात. त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.


कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी मंत्री नितेश राणे यांना कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना, उत्पादन प्रक्रिया आणि भविष्यात महाराष्ट्रात उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक माहिती दिली.


या उपक्रमामुळे मुंबईत जलवाहतुकीला गती मिळेल, किनारपट्टीच्या क्षेत्रात विकास होईल आणि नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी उपलब्ध होईल. जलवाहतुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या स्मार्ट सिटी दृष्टीकोनाला नवीन दिशा मिळेल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून

मुंबईतील २७ टक्केच नागरिक साखरेपासून राहतात लांब, व्यायामचा अभाव आणि चुकीचा आहारामुळे असंसर्गजन्य आजारांना दिले जाते निमंत्रण

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून 'मीठ - साखर अभियान

मुंबईतील २५२ कोटींच्या एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा: सलीम शेखच्या कबुलीजबाबाने खळबळ

मुंबई : देशभरात खळबळ माजवणाऱ्या २५२ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणात पोलिसांना आणखी एक मोठा धागा मिळाला

घाटकोपरमध्ये रस्ता रुंदीकरणातील अडथळा झाला दूर

बाधित २४ बांधकामांवर झाली अखेर कारवाई मुंबई (खास प्रतिनिधी) : घाटकोपर येथील झुणझुणवाला महाविद्यालय ते